जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । रिक्षात बसलेल्या तिघा भामट्यांनी पत्रकाराचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील आचार्य अत्रेनगरातील रहिवासी पत्रकार हेमंत शंकरराव काळुंखे (वय ६७) हे दि. ७ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या एमआयडीसी परिसरातील त्रिमूर्ती हॉटेल्सच्या समोर, तुकाराम श्रीपद चौधरी कॉम्प्लेक्स च्या समोर रोडच्या बाजूला, सार्वजिक जागी हुन सोबत रिक्षात बसलेले तीन जण, हिंदी भाषिक इसमांनी फिर्यादीच्या खिश्यातील १० हजार किमतीचा oppo ५३ कंपनीचा मोबाईल लंपास केला. या प्रकरणी काळुंखे यांनी दि. ७ रोजी रात्री ९.१५ एमआयडीसी पोलिसांत फिर्यादी दिली. त्यानुसार सदर इसमांविरुध्द्व गुन्हा दाखल झाला. तपास पोह को, जितेंद्र राजपूत करीत आहे.












