जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । रात्रीच्या वेळी शेतात गव्हाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरातून, चोरट्याने ६० हजाराची रोकड व ५ हजार किंमतीचा मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा ऐवज लांबवला. १० रोजी रात्री ही चोरी झाली होती. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी चोरट्याला अटक केली.
कासोद्यातील बिर्ला चौक परिसरात गुरुवारी रात्री चोरट्याने, शेतकरी दामू कुंभार यांच्या घरात चोरी केली. शेतकरी कुंभार हे शेतात गेले होते. तर त्यांची पत्नी व मुलगी खालच्या खोलीत झोपले होते. घराच्या वरील मजल्यावरून चोरट्याने आत प्रवेश करून कपाशी विक्रीतून आलेले ६० हजार रुपये व मोबाईल लांबवला होता. रोकड कुलूप लावलेल्या पत्री कोठीत होती. त्या कोठीचे कुलूप तोडून चोरट्याने रक्कम लांबवली. तसेच बिर्ला चौकातील योगिता कृषी केंद्र या दुकानातूनही ७०० रुपये चोरीस गेल्याची तक्रार राजेंद्र येवले यांनी नोंदवली.
बिर्ला चौकातील एका सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला होता. त्यामुळे वर्णनावरून पोलिसांनी शेख साहिल शेख युसुफ (वय १९, रा.सैय्यद वाडा, कासोदा) याला अटक केली. पुढील तपास सहदेव घुले, जितेश पाटील, इम्रान खान, स्वप्नील परदेशी करत आहेत.
हे देखील वाचा:
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
- जामनेर तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले
- जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने केळीचा भाव क्विंटल मागे ‘इतक्या’ रुपयांनी वाढला ; शेतकऱ्यांना दिलासा
- Jalgaon : खरीप हंगामासाठी पीकनिहाय कर्जदर निश्चित, केळी-कापूससाठी मिळणार इतके रुपये..
- भाव मिळत नसल्याने मुक्ताईनगरातील शेतकऱ्याने केळी बाग उपटून फेकली