जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । चोपडा तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात सामान्य जनतेस त्रास होत असून शासकीय फी व्यतिरिक्त अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची दररोज हजारोंची लूट अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.
सचदेव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात काम करण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. काही वेळेस कामाचे पैसे घेऊन सुद्धा नागरिकांना फिरवले जाते. जे नागरिक अतिरिक्त पैसे देतात त्यांचेच काम अधिकारी करतात. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी देखील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जात केली आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात तापमान वाढल्यामुळे नारळपाण्याच्या मागणीत वाढ ; नारळपाण्याचे हे फायदे वाचा
- जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता ; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
- विधानभवनात जाऊनच सुटू शकतील शिक्षकांच्या अडचणी : अॅड महेंद्र भावसार
- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात आचार संहितेचे सात गुन्हे दाखल
- यावल येथील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता ; परिसरात खळबळ