⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

‎चोपडा भूमी अभिलेख कार्यालयात लूट‎, एसीबीकडे केली तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ ।
चोपडा‎ तालुक्यातील भूमी अभिलेख‎ कार्यालयात सामान्य जनतेस त्रास‎ होत असून शासकीय फी व्यतिरिक्त‎ अव्वाच्या सव्वा रुपयांची मागणी‎ केली जात आहे. सर्वसामान्य‎ नागरिकांची दररोज हजारोंची लूट‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत‎ असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज‎ सचदेव यांनी लाच लुचपत‎ प्रतिबंधक विभागाकडे केली आहे.‎

सचदेव यांनी तक्रारीत‎ म्हटले आहे की, सर्वसामान्य‎ नागरिकांना भूमी अभिलेख‎ कार्यालयात काम करण्यासाठी हाल‎ अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.‎ काही वेळेस कामाचे पैसे घेऊन सुद्धा‎ नागरिकांना फिरवले जाते. जे‎ ‎ नागरिक अतिरिक्त पैसे देतात‎ त्यांचेच काम अधिकारी करतात.‎ त्यामुळे या कार्यालयातील कर्मचारी,‎ अधिकाऱ्यांच्या संपत्तीची तत्काळ‎ चौकशी करावी, अशी मागणी‎ देखील राष्ट्रवादीचे माजी जिल्हा‎ उपाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी‎ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग‎ यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जात‎ केली आहे.‎

हे देखील वाचा :