केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे ; आरपीआय

मार्च 30, 2021 4:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोरगरीबांना राज्य सरकारने सवलतीच्या दरात अन्नधान्य द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.

anil adakmol

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्न मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे त्यामुळे जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन करण्यात येत असल्याने सर्व उद्योग बंद असल्याने सर्व सामान्य गोरगरीबांना यांचा फटका बसत आहे. अशातच शासन अंत्योदय,बी,पी,एल,व अन्न सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप करीत आहे. मात्र, केशरी शिधापत्रिका धारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याने

राज्यशासनाने सवलतीच्या ८ रूपये किलो गहू १२ रुपये तांदूळ ५५ रूपये चनादाळ व २०रूपये दराने साखर स्वस्त धान्य दुकानाद्धारे वितरित करण्यात यावे. जेणेकरून कोरोनाच्या माहामारीत शेतमजूर, धुणीभांडी करणारेही महिला, विटभट्टी कामगार झोपडपट्टी भागात राहणाऱ्याना गरीबांना मोठा आधार मिळेल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now