जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे शॉट सर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले.
या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बुद्रूक, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या भावाच्या नावे वाघळुद बु. शिवारातील वाघळूद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे.
या शेतात त्यांनी ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मोती पवार करत आहेत.
हे देखील वाचा :
- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात किती उमेदवार वैध-अवैध ठरले ; वाचा ही बातमी
- शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ; ही आहेत शेवटची तारीख
- वाढत्या तापमानामुळे केळी बागा धोक्यात ; दरही कमी मिळत असल्याने शेतकरी संकटात
- ऐनपूरच्या शेतकऱ्याला लावला २३ लाखांचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन