जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२५ । अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया
पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी आल्याने प्रक्रिया स्थगित केली होती. या अडथळ्यानंतर शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार सोमवारपासून (२६ मे) विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल.

यंदापासून राज्यभरात सर्व ठिकाणी अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार सुरुवातीला शिक्षण संस्थांची नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १९ व २० मे रोजी विद्यार्थ्यांना सराव अर्ज आणि त्यानंतर प्रत्यक्ष नोंदणीची प्रक्रिया २२ मे पासून सुरू होणार होती; परंतु विद्यार्थी नोंदणीच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर अडचणी आल्या. तासाभरानंतर संकेतस्थळ सुरू होईल अशी सूचना सुरुवातीला दिली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत संकेतस्थळ सुरू न झाल्याने गुरुवारी दुपारपर्यंत संकेतस्थळ सुरू होईल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात गुरुवारी सायंकाळी शिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
नवीन वेळाफाक असे
२६ मे ते ३ जून: अर्ज नोंदणी व कॉलेजचे पसंतीक्रम देता येईल. ५ जून रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
६ व ७ जून: या कालावधीमध्ये गुणवत्ता यादीवर हरकती मागवणार.
८ जून : अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून फलकावर लागणार.
९ ते ११ जून : विद्यार्थ्यांने प्रवेश महाविद्यालयात निश्चित करावा
१० जून : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत लॉगिनमध्ये महाविद्यालय तपशील उपलब्ध होईल, फेरीनिहाय कट ऑफ पोर्टलवर प्रसिद्ध होईल.
१९ ते १८ जून: या कालावधीत नवीन विद्याथ्यौसाठी नोंदणी होईल.
२० जून: दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल