⁠ 
रविवार, मे 19, 2024

मनूरला शेतकर्‍याची विष प्राशन करीत आत्महत्या!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । सततचे कर्ज व नापिकीला कंटाळून ३५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी द्रव सेवन करून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरम्यान, शेतकर्‍याच्या आत्म्हत्येने हळहळ व्यक्त होत आहेत.

सचिन प्रकाश पाटील (35) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील हे बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रुक आपल्या कुटुंबियनसह वास्तवाय्स आहेत. मिलेल्या माहितीनुसार पाटील याने सततचे कर्ज व नापिकीला कंटाळून रविवार, 28 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास आपल्या कुर्‍हा शिवारातील शेतात विषारी द्रव सेवन केले होते. ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवल्यानंतर उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदन केल्यानंतर शेतकर्‍यावर मनूर ब्रूद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतकर्‍याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परीवार आहे.