कळमडू येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मार्च 8, 2021 9:59 AM

 

succied jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 7 रोजी उघडकीस आली. दरम्यान, याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

कळमडू येथील शेतकरी अंकुश विक्रम पाटील (वय 35) यांचा मृतदेह दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now