जनता कर्फ्यूमुळे सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला करोडोंचा फटका

मार्च 14, 2021 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरात कोरोनाची रुग्ण संख्या अचानक मोठ्या प्रमाणत वाढत असतानाच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.  मात्र जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून सुवर्णनगरीत १०० ते १२५ कोटींच्या सुवर्ण व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. 

gold

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.

जनता कर्फ्युची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने व्यापारी बांधवांनीही करोडो रुपयांच्या उलाढालीचा विचार न करता आपली दुकाने बंद ठेवली. यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली आहे. जळगाव शहर हे सोने व चांदी, धान्य, डाळींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. शहरात दररोज बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now