⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

रेल्वेच्या धडकेत जळगावचा तरुण ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरमधील ३१ वर्षीय तरुणाचा रेल्वेचा फटका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सागर अरुण सरोदे (वय ३०) असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत जळगाव रेल्वे पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत असे की, जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरमधील राहणार सागर सरोदे याचा आज सकाळी शिवाजी नगर स्मशानभूमी जवळील रेल्वे पटरीवरील खांब नंबर ६ जवळ मृतदेह आढळून आला.

याबाबतची माहिती कळताच मित्रमंडळीची रेल्वे पोलीस स्टेशनला गर्दी जमली होती. दरम्यान सागर याचा मृत्यू नेमका रेल्वेचा फटका लागल्याने झाला की त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली.

हे देखील वाचा :