⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

अहिराणी – लेवा – तावडी बोलीचा गोडवा; तिन्ही भाषा जपताय प्राचीन वारसा

जळगाव : खान्देशात प्रामुख्याने अहिराणी भाषेचं वर्चस्व आहे. येथील मराठी भाषिक व्यक्तिंच्या बोलण्यातही काही अहिराणी शब्द आपसूक येवून जातात. खान्देशात साधारणपणे ९०% लोक अहिराणी बोलू शकतात. समजू शकतात. लिहणं मात्र, त्यामानाने अवघड आहे. खान्देशात पूर्वी अभिर राजवट होती. अभिराचे अहिर झाले. त्या अहिरांची भाषा म्हणजे अहिराणी भाषा. या बोलीचे संदर्भ रामायण, महाभारत आणि ज्ञानेश्वरीमध्येही सापडतात. काही शिला लेखांवर अहिराणी भाषेतील श्लोक सापडले आहेत. जे याचे सज्जड पुरावे आहेत. खांदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा काही भाग, औरंगाबादचा एक पट्टा आणि सूरतेचा आसपासचा परीसर हा अहिराणी बोलीने समृध्द आहे. जळगाव जिल्ह्यापुरतं बोलायचं म्हटलं तर येथे प्रामुख्याने तीन बोली भाषा बोलल्या जातात. ज्या स्थानपरत्वे निर्देशित होतात. त्यात अहिराणी, लेवा गण बोली आणि तावडी बोलीचा समावेश होतो. या तिन्ही बोली एकमेकांशी एका अनुबंधाने जोडल्या गेल्या आहेत. ज्यात अहिराणीचं प्राबल्य उठून दिसतं.

या व्यतिरिक्त जिल्ह्यात जात, समाज परत्वे गुजर, पारधी, भिलावू, तडवी बोलीही बोलली जाते. मात्र या सर्वांवर अहिराणीचा मोठा प्रभाव दिसून येतो. अहिराणी शब्दांचेच अपभ्रंश होवून विविध बोलीत शब्द संपदा निर्माण झाली आहे. पूर्वी बहिणाबाईंची गाणी. बहिणाबाईंची कविता, गाणी ही काही वर्षांपूर्वी अहिराणी म्हणूनच मिरत होती. मात्र, सद्य परिस्थितीतीत जातींची स्वतंत्र अस्मिता जोरकसपणे जोपासली जात असल्याने, त्यातून आपापल्या बोलींची, दैवतांची, नेत्यांची विभागणीही जोरकसपणे होतांना दिसत आहे. म्हणूनच बहिणाबाईंची गाणी आता लेवा गणबोलीची गणली जातात. त्यातूनच आपापल्या बोलीची संमेलनंही आकाराला येत आहेत. तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर अहिराणी बोलीचे आतापर्यंत ८ राज्यस्तरीय, दोन अखिल भारतीय आणि दोन विश्व संमेलनं पार पडली आहेत. तर लेवा गणबोली आणि तावडी बोलीचे प्रत्येकी एक संमेलन झाले आहे.

अहिराणी बोली :

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा आणि अमळनेर या तालुक्यातली अहिराणी ही बोलीभाषा आहे. इतर भागांपेक्षा येथील अहिराणी ही शुध्द आणि कमीत कमी अपभ्रंश झालेली आहे. अहिराणी भाषेत ळ च्या ऐवजी य, ण च्या ऐवजी नचा वापर केलेला दिसून येतो. अहिराणीला तिचा स्वतःचा असा अंगभूत गोडवा आहे. भाषेला लय आहे. यामुळेच अहिराणी बोलीतील लग्नाची गाणी, आखाजी, गौराईची गाणी, गुलाबाईची गाणी खान्देशात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. षष्टीचे प्रत्यय चा/ची/चे हे ना/नी/ने बनून येतात.

अहिराणी बोलतांना तुझं-तुन्ह, माझं-मन्ह, तेन्ह-तेस्न, आम्हना, तुम्हना, धल्ला, धल्ली, समदं, बठ्ठं, येस, जास, बस्स, उठस, करस, चालस, पयस, जेवस, याय, कोंडायं, समार या शब्दांचा वापर होतो. उडी मारणे – कुदी, चिमणी – चिडी, म्हातारा – धड्ला हे शब्द वापरात येतात. नात्यांनाही स्वतंत्र शब्द आहे. आत्या – फुई. मुलगा-आंडोर, पुतण्या-डिक्रा, पुतणी – डिक्री असे आहेत. क्रियांसाठी करणे-करस, भरणे-भरस, भांडण – उपादी, शोभणे-वडणे, भांडण – उपादी. अहिराणीत म्हणी आणि वाक्प्रचार यांची मोठी समृध्दता आहे. भांडण, तंट्यात वापरल्या जाणाऱ्या शिव्यांचीही अहिराणीत कमतरता नाही. समाज माध्यमांवर नुकतंच एक म्हणींचं संकलन वाचनात आलं होतं. त्यातून अहिराणी शब्दांची विविधता. त्यांचा चपखल वापर आणि त्यातून निर्माण होणारा विनोद, कटू वास्तव याची कल्पना येते. या म्हणी आजही काळाच्या कसोटीवर चपखल बसतात. हीच त्यांची अक्षयता आहे. याच म्हणी, किरकोळ स्वरुपाचा बदल होवून, लेवा बोलीत आणि तावडी बोलतही वापरल्या जात असाव्या. कारण त्यांच्यावर अहिराणीचाच प्रभाव आहे.

आहिराणी मधील काही म्हणी :

  • घरना पोरं उघडा, नी याहीनले नेसाडा लुगडा
  • चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला
  • दये तिले कये, नी फुकटी गोंडा घोये
  • खिंसामा नही आना, नी माले बाजीराव म्हना.
  • खिसामा नही कवडी, नी उना बाजार भवडी.
  • जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको.
  • चार आनानी पेवानी, नी बारा आनानी दखाडानि.
  • येडी नं मत, नी घुबड ना चाळा.
  • आई बाई नि दिधी भर,नी उठ व धल्ली नवरा कर.
  • निधी ना भंडारा, नी गावभर डोम्बारा.
  • तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले.
  • काम् नही काय करु, लुगडं फ़ाडी दान्डे करु.
  • सोनारणी पीटी पीटी, नी लोहार नि एकच बठी.
  • खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी.
  • माले ना तुले, घाल कुत्राले.
  • तोच गुल, नी तीच काडी.
  • चिडी खोपामा, नी जीव धोकामा.
  • कागद ना बाऊ, नी बाहेर नको जाऊ.
  • रीस नी माय, भिक मांगी खाय.
  • धल्ला(म्हातारा)नवरा कया, कुळले आसरा झाया.
  • घरन झायं थोडं, नी याहीनी धाडं घोडं.
  • जवाईनं पोर, हरामखोर.
  • सख्खा भाऊ, पक्का वैरी.
  • एक धल्ली टम टम करे आणि तिण कम्बर १७ जण मोडेत.
  • सासू तशी सून, नी उम्बारना गुण.
  • गाव नी खावा लाथ, पण परगाव ना खाऊ नाही भात.
  • आसू न पासु, मारी गायी सासू..
  • नक्टी ना लगनमा १७ ईघ्ने
  • ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी.
  • दिनभर आथी तथी, दिन मावयना जाऊ कथी.
  • आग मारे ते खोबारनं तेल, नी फसफस करे ते गोड तेल.
  • खावाले काळ, नी भूईले भार.
  • घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका.
  • जय जय भवानी, थोडी थोडी पेवानी, पोलीस ऊनात की लपाडी देवानी.
  • पाटीलबवाले जग भ्याये, नि घरनी बाई अंघोटा दाये.
  • बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले.
  • रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा.
  • दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरमा.
  • दियेल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही.
  • धल्ला(म्हातारा)नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे.
  • आग लाऊ, तमासा पाहू.
  • आसू ना पासु, मारी गई सासू.
  • कवळ मवळ, आडई तव्हळ.
  • उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो.
  • हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले.
  • उस गोड झाया, ते ते मुईसंमत खाऊ नही.
  • आईबाई नडणी, कानबाई घडणी.
  • घऱोघर संदेश, सोनाना खाऩ्देश.
  • बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.
  • इसगाव तीसगाव, भिकारीले चाईसगाव.
  • बाबा बी गयात अन् दशम्या बी गयात.
  • आचर वचर, धल्लानी पाचर.
  • यु मारू त्यु मारू, निकल गया तो क्या करू.
  • सत्यम् शिवम् सुंदरम्…सुंदरम् मन्हा खान्देशम्.
  • आई बाई नी दिनी भर, उठ व धल्ली नवरा कर.
  • करमम्हान पड कोड, हसिबोली गोड करी ल्हेओ.
  • भरम ना भोपळा, चारी पाय मोकळा.
  • ईय्या मोडी खिय्या करो
  • मर्द मराठा गडी तोच भिलाटी चढि.
  • घोय मा घोय आणि म्हणे धिरे धिरे चोय.
  • आडं तिडं करे नि कंबर मुडे, खापरे बसे तिने नाव कागदे चढे.
  • घर म्हा नाही दाणा अन् म्हणे कलर टिव्ही आणा.
  • ऐशी ना बैशी सुन ना सासु ले काय बोलशी.
  • लाडकोड ना भाऊ, बाहेर नको जाऊ.
  • मोठानं दुखे पोट तं दरजा लोगुन जाये गोट.
  • डोकावर गोंटं अन् म्हणे गाव कोणतं.
  • अन्नाडूना बारवर घडी घडी जानं पडस.
  • देव त्याले खेव.
  • आमुनी कमाई, जामूम्हान गमाई.
  • अधोडी खाये, त्याले मधुरा व्हये.
  • कधी ना मधी, गई हुबी नदी..
  • वाटे ते बोट चाटे.
  • पेरई तसे उगई.
  • मना माल आणि मन्हाच हाल.
  • कुथे ना काथे अन् उठी उठी बठे.
  • म्हणा का बोला, बेलदार ना हेला.
  • ये म्हैस घाल म्हा शिंग.
  • अम्हनाच दांडा, नि अम्हनीच कुर्हाड.
  • कीतलभी कय तरी, कोल्लाच हाथ निघस.
  • कोपरा देखी थुको, नी जागा देखी मुतो.
  • वाण्या ना घरमा ऊंदीर कारभारी.
  • एक दिन ना पावना, दुसरा दिन पई, तिसरा दिन गोट कथी गयी.
  • कोन्ही सोनानी सरी बांधी ते आपून दोरी घाली मरू नई.
  • खावाले काळ, नि भूईले भार.
  • कुडी देखी, पुडी वाढो.
  • जेन्ही माय मरंस त्यालेच रडु येस.
  • रोज मरे त्याले कोन रडे.
  • जो तो जेनं तेनं तानस, ह्या भाऊ नं कोन जानस.
  • मास्तरीन ताई अन् दोन दोन टिकल्या लाई.
  • करकडे ते सरकडे.
  • बाप व्याजना उचलंस, माय उसना वाटंस.
  • घरम्हा नाही दाना अन् म्हणे बाजीराव म्हणा.
  • करा का वरा, फुटकी गोंडा धरा.
  • दिन जाउ द्या अन् पगार येऊ द्या.
  • रहिते दिवाळी, नहिते शिमगा.
  • माय मरो, मावशी मरो.
  • आपलाच दात, नी आपलाच व्हट.
  • निमण कीडं निमलेच गोड लागस.
  • कुत्रान शेपूट वाकड त वाकडच रास.
  • इच्चुना पिल्ला इच्चुले फोली खाई जातस.
  • लाथा हाना, पण पाटील म्हणा.
  • तोंड करे बाता, नी खाये लाथा.
  • हेलानं मरनं दसराले चुकाव नाही.
  • हजार ना धंदा नी वडापाव खावाना ना वांदा.
  • थाठीवरथी उठा, नी पोठीवर बघा.
  • सुम बळी जास, पण वळ नही जात.
  • मोठा तितला खोठा.
  • सैड्यानी झेप, वडांगलोंग.
  • वैदनं पोरे पांगळं.
  • कसामा ना मसामा आंधळं घोडं तमासामा.
  • घर ना वैरी घर भोवती फिरी.
  • बाईनी जात बावळी, ……नी जागे चावळी.
  • लोक नं पोर लीधं कडे, तेनं चीत माय बाप कडे.
  • घर सोडी, आंगण पारखं.
  • आईवर न बाईवर, जाई पडी फुईवर.
  • चेपनं सोडी, चाफलू नही.
  • उठा ठेव अन् डालका म्हा देव.
  • शिक्शन कमी पगार जास्त.
  • उन्दिरना जीव जाये, मांजर धवाया करे.
  • अब्रूनं मरी जाय, बिन अब्रूनं गाना गाय.
  • मनमा मांडा, नी पदर मा धोंडा.
  • लागी गया डोया, नी सरी गया पोया.
  • आडी रोज पुऱ्या नी सनले घुगऱ्या.
  • इये न जाये, जम्हाया खाये.
  • सक्खा सोबती पक्का घातकी.
  • आन्घे न मांघे, नी दोन्ही हाथ संघे.
  • घोडास्वर उनात अन् गधडास्वर गयात.
  • चुलत मुलत नी गया कोल्हत.
  • आग म्हाईन निघीसन, फफुटामा पडणा.
  • नाचता इयेना अंगण वाकड, रांधता इयेना वल्ला लाकड.
  • कोनी सरी लिधीतं आपन दोरी ली मरो नई.
  • गरीब गाय अन् पोट म्हा पाय.
  • काम ना धाम, उघडा आंगले घाम.
  • मी सांगस म्हणीशीन रातले म्हणा तुमी दिन.
  • कोना कोन नी घोडानं तोंड.
  • हाइतं घोडा इकिसनं डांगरे खावानं काम हुई गयं.
  • लेनं ना देनं कंदिल लाई येनं.
  • साजे ना सुजे अन् ढोलगं वाजे.
  • घर ना मांग अन् झाडनीसले पांग.
  • मी राजा तु रानी , ले पानी कोन आनी.
  • बारास्नी माय अन् खाटलावर जीव जाय.
  • मले पहा अन् मग्गम रहा.
  • मोठा भाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये.
  • येडा चाया, अन् बाबु राया.
  • दिखने मे अच्छा, चलने मे ढब्बू.
  • जेना हात मुडस, तेनाच गयामा पडस.
  • सिदोड ले उना राग माले म्हणा म्हने फण्या नाग.
  • याही याही नं भांडण हुई अन् म्हदमा पडी तो गाया खाई.
  • मातीनं -हातं तं फुटी जातं.
  • उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उना.
  • आंधया म्हणे च्या, बहीरा म्हणे म्या.
  • आथाईन फरशी तथाईन फरशी तु तं कपाशी देखी देखीच मरशी.
  • गावन कुत्रं गावम्हन भुकंस.
  • दुना दुबारा गुढी उभारा.
  • कये ना वये चालना धुये.
  • ज्याना कपडा फाटेल , त्यांनी खावो पिव्वी पटेल.
  • गाडाना खाले कुत्रं चालंस तेले वाटस मीच गाडं व्हडस.
  • ऐकणारनी एक बात, नाही ऐकणारनं सुपड साफ.
  • मना मामान्या शंभर गायी, सकाय उठी काही ना माही.
  • दात कोरीसन पोट थोडी भरंस.
  • भडगाव नी भडक मोठी, खाले भाकर वर रोटी.
  • आय ना धस,ना माय ना धस.माटी उडे फसाफस.
  • घरनी मोरी,नि मुतानी चोरी.
  • डोकामा नही भुसा, नि कोठेबी घुसा.
  • खाल मुंडी, पाताळ धुंडी.
  • उंदीरले सापडनी चिंधी, डोकाले लिन्ही बांधी.
  • घरना पोरं उघडा, नी याहीनले नेसाडा लुगडा.
  • चार आनानी कोंबडी, नी बारा आनाना मसाला.
  • दये तिले कये, नी फुकटी गोंडा घोये
  • खिंसामा नही आना, नी माले बाजीराव म्हना.
  • खिसामा नही कवडी, नी उना बाजार भवडी.
  • जीव म्हणे आखो आखो, नी पोट म्हणे नको नको.
  • चार आनानी पेवानी, नी बारा आनानी दखाडानि.
  • येडी नं मत, नी घुबड ना चाळा.
  • आई बाई नि दिधी भर,नी उठ व धल्ली नवरा कर.
  • निधी ना भंडारा, नी गावभर डोम्बारा.
  • तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले.
  • काम् नही काय करु, लुगडं फ़ाडी दान्डे करु.
  • सोनारणी पीटी पीटी, नी लोहार नि एकच बठी.
  • खान तशी खापरी,नी माय तशी छोकरी.
  • माले ना तुले, घाल कुत्राले.
  • तोच गुल, नी तीच काडी.
  • चिडी खोपामा, नी जीव धोकामा.
  • कागद ना बाऊ, नी बाहेर नको जाऊ.
  • रीस नी माय, भिक मांगी खाय.
  • धल्ला(म्हातारा)नवरा कया, कुळले आसरा झाया.
  • घरन झायं थोडं, नी याहीनी धाडं घोडं.
  • जवाईनं पोर, हरामखोर.
  • सख्खा भाऊ, पक्का वैरी.
  • एक धल्ली टम टम करे आणि तिण कम्बर १७ जण मोडेत.
  • सासू तशी सून, नी उम्बारना गुण.
  • गाव नी खावा लाथ, पण परगाव ना खाऊ नाही भात.
  • आसू न पासु, मारी गायी सासू..
  • नक्टी ना लगनमा १७ ईघ्ने
  • ज्यांना घर पत्थर नि मावठी, त्यांनीच पेओ गावठी.
  • दिनभर आथी तथी, दिन मावयना जाऊ कथी.
  • आग मारे ते खोबारनं तेल, नी फसफस करे ते गोड तेल.
  • खावाले काळ, नी भूईले भार.
  • घरमा फुटेल बोयका, नि मांगस दोन-दोन बायका.
  • जय जय भवानी, थोडी थोडी पेवानी, पोलीस ऊनात की लपाडी देवानी.
  • पाटीलबवाले जग भ्याये, नि घरनी बाई अंघोटा दाये.
  • बाईना फुले बाईले, नि शाबासी मन्हा याहीले.
  • रायरंग रातभर राजा, नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा.
  • दुसरी वणी घरमा, पयली गयी घोरमा.
  • दियेल शिदोरी, आणि सांगेल आक्कल पुरत नही.
  • धल्ला(म्हातारा)नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे.
  • आग लाऊ, तमासा पाहू.
  • आसू ना पासु, मारी गई सासू.
  • कवळ मवळ, आडई तव्हळ.
  • उक्खळ म्हान डोक घाल, आते फुटो का रहावो.
  • हाड्याले (कावळा) झाये उडाले, नी फाटीले (झाडाची फांदी) झाये मुडाले.
  • उस गोड झाया, ते ते मुईसंमत खाऊ नही.
  • आईबाई नडणी, कानबाई घडणी.
  • घऱोघर संदेश, सोनाना खाऩ्देश.
  • बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.
  • इसगाव तीसगाव, भिकारीले चाईसगाव.
  • बाबा बी गयात अन् दशम्या बी गयात.
  • आचर वचर, धल्लानी पाचर.
  • यु मारू त्यु मारू, निकल गया तो क्या करू.
  • सत्यम् शिवम् सुंदरम्…सुंदरम् मन्हा खान्देशम्.
  • आई बाई नी दिनी भर, उठ व धल्ली नवरा कर.
  • करमम्हान पड कोड, हसिबोली गोड करी ल्हेओ.
  • भरम ना भोपळा, चारी पाय मोकळा.
  • ईय्या मोडी खिय्या करो
  • मर्द मराठा गडी तोच भिलाटी चढि.
  • घोय मा घोय आणि म्हणे धिरे धिरे चोय.
  • आडं तिडं करे नि कंबर मुडे, खापरे बसे तिने नाव कागदे चढे.
  • घर म्हा नाही दाणा अन् म्हणे कलर टिव्ही आणा.
  • ऐशी ना बैशी सुन ना सासु ले काय बोलशी.
  • लाडकोड ना भाऊ, बाहेर नको जाऊ.
  • मोठानं दुखे पोट तं दरजा लोगुन जाये गोट.
  • डोकावर गोंटं अन् म्हणे गाव कोणतं.
  • अन्नाडूना बारवर घडी घडी जानं पडस.
  • देव त्याले खेव.
  • आमुनी कमाई, जामूम्हान गमाई.
  • अधोडी खाये, त्याले मधुरा व्हये.
  • कधी ना मधी, गई हुबी नदी..
  • वाटे ते बोट चाटे.
  • पेरई तसे उगई.
  • मना माल आणि मन्हाच हाल.
  • कुथे ना काथे अन् उठी उठी बठे.
  • म्हणा का बोला, बेलदार ना हेला.
  • ये म्हैस घाल म्हा शिंग.
  • अम्हनाच दांडा, नि अम्हनीच कुर्हाड.
  • कीतलभी कय तरी, कोल्लाच हाथ निघस.
  • कोपरा देखी थुको, नी जागा देखी मुतो.
  • वाण्या ना घरमा ऊंदीर कारभारी.
  • एक दिन ना पावना, दुसरा दिन पई, तिसरा दिन गोट कथी गयी.
  • कोन्ही सोनानी सरी बांधी ते आपून दोरी घाली मरू नई.
  • खावाले काळ, नि भूईले भार.
  • कुडी देखी, पुडी वाढो.
  • जेन्ही माय मरंस त्यालेच रडु येस.
  • रोज मरे त्याले कोन रडे.
  • जो तो जेनं तेनं तानस, ह्या भाऊ नं कोन जानस.
  • मास्तरीन ताई अन् दोन दोन टिकल्या लाई.
  • करकडे ते सरकडे.
  • बाप व्याजना उचलंस, माय उसना वाटंस.
  • घरम्हा नाही दाना अन् म्हणे बाजीराव म्हणा.
  • करा का वरा, फुटकी गोंडा धरा.
  • दिन जाउ द्या अन् पगार येऊ द्या.
  • रहिते दिवाळी, नहिते शिमगा.
  • माय मरो, मावशी मरो.
  • आपलाच दात, नी आपलाच व्हट.
  • निमण कीडं निमलेच गोड लागस.
  • कुत्रान शेपूट वाकड त वाकडच रास.
  • इच्चुना पिल्ला इच्चुले फोली खाई जातस.
  • लाथा हाना, पण पाटील म्हणा.
  • तोंड करे बाता, नी खाये लाथा.
  • हेलानं मरनं दसराले चुकाव नाही.
  • हजार ना धंदा नी वडापाव खावाना ना वांदा.
  • थाठीवरथी उठा, नी पोठीवर बघा.
  • सुम बळी जास, पण वळ नही जात.
  • मोठा तितला खोठा.
  • सैड्यानी झेप, वडांगलोंग.
  • वैदनं पोरे पांगळं.
  • कसामा ना मसामा आंधळं घोडं तमासामा.
  • घर ना वैरी घर भोवती फिरी.
  • बाईनी जात बावळी, ……नी जागे चावळी.
  • लोक नं पोर लीधं कडे, तेनं चीत माय बाप कडे.
  • घर सोडी, आंगण पारखं.
  • आईवर न बाईवर, जाई पडी फुईवर.
  • चेपनं सोडी, चाफलू नही.
  • उठा ठेव अन् डालका म्हा देव.
  • शिक्शन कमी पगार जास्त.
  • उन्दिरना जीव जाये, मांजर धवाया करे.
  • अब्रूनं मरी जाय, बिन अब्रूनं गाना गाय.
  • मनमा मांडा, नी पदर मा धोंडा.
  • लागी गया डोया, नी सरी गया पोया.
  • आडी रोज पुऱ्या नी सनले घुगऱ्या.
  • इये न जाये, जम्हाया खाये.
  • सक्खा सोबती पक्का घातकी.
  • आन्घे न मांघे, नी दोन्ही हाथ संघे.
  • घोडास्वर उनात अन् गधडास्वर गयात.
  • चुलत मुलत नी गया कोल्हत.
  • आग म्हाईन निघीसन, फफुटामा पडणा.
  • नाचता इयेना अंगण वाकड, रांधता इयेना वल्ला लाकड.
  • कोनी सरी लिधीतं आपन दोरी ली मरो नई.
  • गरीब गाय अन् पोट म्हा पाय.
  • काम ना धाम, उघडा आंगले घाम.
  • मी सांगस म्हणीशीन रातले म्हणा तुमी दिन.
  • कोना कोन नी घोडानं तोंड.
  • हाइतं घोडा इकिसनं डांगरे खावानं काम हुई गयं.
  • लेनं ना देनं कंदिल लाई येनं.
  • साजे ना सुजे अन् ढोलगं वाजे.
  • घर ना मांग अन् झाडनीसले पांग.
  • मी राजा तु रानी , ले पानी कोन आनी.
  • बारास्नी माय अन् खाटलावर जीव जाय.
  • मले पहा अन् मग्गम रहा.
  • मोठा भाऊले वाडा भ्याये, नि घरनी बाई बाहेर पये.
  • येडा चाया, अन् बाबु राया.
  • दिखने मे अच्छा, चलने मे ढब्बू.
  • जेना हात मुडस, तेनाच गयामा पडस.
  • सिदोड ले उना राग माले म्हणा म्हने फण्या नाग.
  • याही याही नं भांडण हुई अन् म्हदमा पडी तो गाया खाई.
  • मातीनं -हातं तं फुटी जातं.
  • उच्चा झाडवर बुच्चा बसणा, असा राज कधी ना उना.
  • आंधया म्हणे च्या, बहीरा म्हणे म्या.
  • आथाईन फरशी तथाईन फरशी तु तं कपाशी देखी देखीच मरशी.
  • गावन कुत्रं गावम्हन भुकंस.
  • दुना दुबारा गुढी उभारा.
  • कये ना वये चालना धुये.
  • ज्याना कपडा फाटेल , त्यांनी खावो पिव्वी पटेल.
  • गाडाना खाले कुत्रं चालंस तेले वाटस मीच गाडं व्हडस.
  • ऐकणारनी एक बात, नाही ऐकणारनं सुपड साफ.
  • मना मामान्या शंभर गायी, सकाय उठी काही ना माही.
  • दात कोरीसन पोट थोडी भरंस.
  • भडगाव नी भडक मोठी, खाले भाकर वर रोटी.
  • आय ना धस,ना माय ना धस.माटी उडे फसाफस.
  • घरनी मोरी,नि मुतानी चोरी.
  • डोकामा नही भुसा, नि कोठेबी घुसा.
  • खाल मुंडी, पाताळ धुंडी.
  • उंदीरले सापडनी चिंधी, डोकाले लिन्ही बांधी.

अहिराणि म्हणींचं हे संकलन ज्याने केले आहे, ते अहिराणी बोलीच्या संवर्धनातलं एक महत्वाचं काम आहे. संदर्भ म्हणून ते अभ्यास करणाऱ्यांसाठी उपयुक्तच आहे. यातून अहिराणीचा परखडपणा आणि पारदर्शीता दिसून येते. यातली विनोदी वृत्ती सहज ओठावर हास्य फुलवते. अहिराणीत प्रा. राजा महाजन, प्राचार्य सदाशिव माळी, प्रा. डाॅ. रमेश माळी, डॉ. बापूराव देसाई, डॉ. फुला बागूल, रामदास वाघ, आबा महाजन, लतिका चौधरी यांनी मोठ्या प्रमाणावर लेखन केले आहे. अजूनही अनेकांनी यात भरीव योगदान दिलेलं आहे. अहिराणीचे पहिले संमेलन – मंडळ-प्रा. राजा महाजन अध्यक्ष, दुसरे-कासारा-प्राचार्य सदाशिव माळी, तिसरे-चाळीसगाव-प्रा. डाॅ. रमेश सुर्यवंशी, चवथे-नाशिक-डाॅ. शकुंतला चव्हाण, पाचवे-धुळे-सुभाष अहिरे, सहावे-चिंचवड-डाॅ.बापूराव देसाई, सातवे-निगडी-रामदास-वाघ, अभा- पिंप्री-डाॅ. फुला बागुल, पिंगळवाडे-डाॅ. संजीवकुमार सोनवणे. ही परंपरा मोठी असून साहित्य निर्मितीही मोठी आहे.

अहिराणीचा पुरातन पुरावा शके ११२८ अर्थात सन १३०६ चा असून तो चाळीसगाव तालुक्यातील पाटण येथील आहे.

लेवा गणबोली :

लेवा पाटीदार समाज हा प्रामुख्याने शेतीकाम करणारा असून तो जळगाव जिल्ह्य़ातील पूर्व भागात विखुरला आहे. तापी, पूर्णा, वाघूर, गिरणाच्या काठावरील परीसरात लेवा बोली बोलली जाते. जामनेर तालुक्याचा उत्तरभाग, भुसावळ, जळगाव, रावेर, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मलकापूर तालुका, बुलढाणा जिल्ह्य़ातील काही भाग हे लेवा बोलीचे क्षेत्र आहे. लेवा बोलीला स्वतःचं सौष्ठव असून, तिला अंगभूत गोडवा आहे. नाद आहे. लय आहे. तिचं स्वतःचं व्याकरण आहे. म्हणी व वाक्प्रचार आहेत.

  • कुठे गेला होता-कुढी गेल्था
  • इकडे ये-आढी ये.
  • मला-मले, कश्यासाठी-काम्हून
  • तुला-तुल्हे, गेला होता – गेल्था
  • तेव्हा – तव्हा,
  • केव्हा – कव्हा
  • या प्रमाणे शब्दकळा खुलत जाते

बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे. श्रीराम अत्तरदे, रुक्मिणीबाई, भानू चौधरी, अ. कृ. नारखेडे, नि. रा. पाटील, दिवाकर चौधरी, डॉ. श. रा. राणे, पडाॅ. प्र. श्रा. चौधरी, पद्मावती जावळे यांनी लेवा बोलीत लेखन केले आहे. लेवा बोलीचं नुकतंच एक संमेलन जळगावात संपन्न झाले आहे.

तावडी बोली :

तावडी बोली आणि लेवा बोली यांच्यात एक धुसर अशी रेषा आहे. जी दोघांना वेगळी करते. इतर भाषीकांना हा फरत लक्षातही येणार नाही इतका सुक्ष्म आहे. जळगाव जिल्ह्य़ातील जामनेर आणि पाचोरा या दोन तालुक्यातच तावडी बोलीचा वापर होतो. हा प्रामुख्याने अजिंठा डोंगर रंगांचा प्रदेश आहे. येथील लोकंही शेतीचा मुख्य व्यवसाय करतात. उच्चार प्रक्रियेत लघुत्तम रुप वापरण्यावर तावडीचा भर आहे. अर्थात भाषीक काटकसर असंही आपण म्हणू शकतो. आला होता-आल्या, गेला होता-गेल्ता, पाहिला होता- पाहाल्ता, राहिला होता – राहल्ता, झाला होता- झाल्ता, कुठ पर्यंत-कुठलोंग, केव्हा पासून – केव्हाचा, तेथ पर्यंत- तढलोंग, इथ पर्यंत – आढलोंग अशी तावडीतली शब्द रुपांतरं आहेत. तावडी बोलीचं पहिलं राज्य संमेलन जामनेर येथे गो. तु. पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले आहे. तावडी बोलीतून डॉ. अशोक कोळी संशोधनात्मक कार्य करत असून त्यांची कथा, कादंबरी, कविता, बालकविता, समिक्षा या प्रकारात लेखन केले आहे.

तावडी बोलीतही स्वतंत्र म्हणी आणि वाक्प्रचार आहेत.

या सर्व विश्लेषणातून बोली भाषा ह्या मराठी भाषेला पुरक असल्याचेच सिध्द होते. ज्या भाषेत जास्तीत जास्त बोली भाषा असतात ती भाषा अधिक समृद्ध मानली जाते. मराठीला एकूण ६० बोली भाषा असल्याचे नमूद केले आहे. प्रत्येकाने आपली बोली जपली पाहिजे. तिचा वापर संवर्धन करायला हवे. त्या बोलीत विपूल लेखन व्हायला हवे. आपल्या बोलीचा अभिमान हवा. गर्व नको. गर्व केला तर हवे, दावे, स्पर्धा वाढत जाते. त्यातून काही हित साध्य होण्यापेक्षा अहित होण्याचीच शक्यता असते. म्हणून भाषा भगिनी गुण्यागोविंदाने नांदणे हे सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक आहे.

©️ प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, नेताजी रोड.
धरणगाव जि. जळगाव.
(९४२३४९२५९३ /९८३४६१४००४)