जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १०५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. प्रेतयात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.

हे देखील वाचा :
- महागाईचा आणखी एक झटका! महाराष्ट्रात दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?
- जळगाव जिल्ह्याला आज पुन्हा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
- जळगाव बायपासवरील काम युद्धपातळीवर; १५ ऑगस्टपासून एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला
- ‘एक पेड़ पापा के नाम’! जळगावात वडिलांच्या स्मृतींना वृक्षारोपणातून मानवंदना
- बैलजोड्या चोरीप्रकरणी तिघांना अटक; ७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त







