राज्य शासनाचा मोठा निर्णय : होम क्वारंटाइनचा कालावधी असणार ‘इतके’ दिवस

फेब्रुवारी 18, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२१ । महाराष्ट्रात करोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

corona

आता केवळ आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही तर अँटिजेन टेस्टवर आपण भर देणार आहोत. अँटिजेनच्या टेस्ट वाढवाव्या लागतील. अँटिजेन टेस्ट किट खरेदी केली तर त्याचा हिशोब जिल्हा प्रशासनाला कळवला पाहिजे. अँटिजेनमध्ये किती पॉझिटिव्ह होतात याचा रेकॉर्ड ठरवला पाहिजे. त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत, असं टोपे यांनी सांगितलं. क्वारंटाइनचा कालावधीही 7 दिवसांचा असणार आहे. क्वारंटाइन असताना लोकांनी नियम पाळणे बंधनकारक आहे.

राज्यातील मंत्री आणि आमदारांनाही करोनाचा संसर्ग झालेला आहे. याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यातील ७० आमदार आणि १० ते १५ मंत्री करोनाबाधित असल्याचे ते म्हणाले. हे सर्व दररोज कामानिमित्त फिरायचे. लोकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now