Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । अमळनेर वासियांनो शासकीय जमिनी मालकी हक्काने करून घेण्यासाठी शासनाने ८मार्च २०१९ रोजी अधिनियम प्रसिद्ध केले होते. त्याची मुदत ८ मार्च २०२२ला संपली आहे. परंतु, प्रा. अशोक पवार यांची मागणी व आमदार अनिल पाटील यांचे पत्र तसेच पाठ-पुराव्याने या अधिनियमाची मुदत दोन वर्षांनी वाढलीय, म्हणजे ८ मार्च २०२४ पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला शासकीय जमिनी मालकी हक्काने करून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली आहे.
या संदर्भातील अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे करावा लागेल. यात रहिवास प्रयोजनासाठी धारण केलेल्या जमिनी, त्यात या जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या १५ टक्के एवढी रक्कम भरावी लागेल. सवलतीचे दर ८ मार्च २०१९च्या अधिनियमात नमूद केले आहेत. वाणिज्य, रहिवास व सहकारी गृहनिर्माण या संस्थांना देण्यात आलेल्या शासकीय जमिनी म्हणजेच भोगवटादार दोन असून या जमिनी भोगवटादार एकमध्ये रूपांतरीत करता येणार आहेत. दरम्यान, नागरिकांच्या वतीने आमदार अनिल पाटील यांचे नागरी हित दक्षता समितीने आभार मानले आहेत.
याप्रसंगी प्रा. अशोक पवार, बन्सीलाल भागवत, डी. ए. धनगर, एस. सी. तेले उपस्थित होते. या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे नागरिक दक्षता समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्न तसेच पाठपुराव्यामुळे मुदतवाढ मिळाल्याने नागरि हित दक्षता समितीच्या सदस्यांसह लाभार्थींनी आमदार पाटील यांचे काैतुक केले आहे.