⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय, खडसेंच्या आरोपावर गिरीश महाजनांचे जोरदार प्रत्त्युत्तर, म्हणाले..

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । राष्ट्रवादीचे (NCP) नेते आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या (Shinde Fadnavis Govt) मंत्रिमंडळ विस्तारावर (Maharashtra Cabinet Expansion) टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने विस्तारात ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. आता त्यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पलटवार करत टीका केली.गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर (OBC) अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, असा इशारा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे. Girish Mahajan criticism of Eknath Khadse

राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.गिरीश महाजन यांचे पहाटे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.

यावेळी महाजन म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचं सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच जळगावात आले होते. यावेळी त्यांचं त्यांच्या समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आता जबाबदारी मोठी आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचं सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

तसेच मंत्रिपदाच्या खातेवाटपाबाबत त्यांना विचारण्यात आले असता त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खाते वाटप लवकरच होणार आहे. अधिवेशन समोर असल्याने त्यापूर्वीच खाते वाटप करण्यात येईल, असं ते म्हणाले.

पंकजा मुंडे नाराज नाहीत
पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. त्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे कुठे नाराज आहेत, असं मला वाटतं नाही. पक्षश्रेष्ठी त्यांचा विचार करतील. त्यांना मोठं पद मिळेल, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर थोडीफार नाराजी असतेच मग ते एका पक्षाचे सरकार असलं तरी असतेच. थोडे दिवस ही नाराजी असते, असंही त्यांनी सांगितलं.