⁠ 
मंगळवार, मार्च 19, 2024

अरे बापरे..! जळगावात भरधाव डंपरने तब्बल 15 बकऱ्यांना चिरडले

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२३ । रस्त्याने भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील डंपर चालक बेभानपणे गाडी चालवत असल्याचे बऱ्याचदा दिसून येते. अशातच भरधाव डंपरने महामार्ग ओलांडणाऱ्या तब्बल 15 बकऱ्यांना चिरडले. ही धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ आज मंगळवारी दुपारी घडलीय. दरम्यान, या घटनेनेनंतर स्थानिकांनी डंपरचालकाला पकडून एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नेमकी काय आहे घटना?
चिंचोली येथील कैलास लटकन कोळी हे बकऱ्या पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे २० ते २५ बकऱ्या आहे. दरम्यान, ते आज सकाळी रानात बकऱ्यांना चारून ते दुपारी चिंचोली गावात आले. त्यांच्यासोबत प्रभाकर इखे, गणेश धुमाळ, कैलास पालवे आणि दिदास बागले यांच्या देखील मालकीच्या बकऱ्या सोबत होत्या. गावाजवळून जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.

यावेळी कैलास कोळी हे बकऱ्यांना महामार्गावरून ओलांडून नेत असतांना जामनेकर कडून जळगावकडे जाणारा डंपर क्रमांक (एमएच १९ वाय ७७७३) हा सुसाट वेगाने येत असातांना रस्ता ओलांडणाऱ्या बकऱ्यांना चिरडून टाकले. यात एकुण १५ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थानी धाव घेतली व डंपरचालकाला ताब्यात घेतले. या अपघातात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, डंपरचालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.