⁠ 
रविवार, मे 19, 2024

जामनेर येथे‎ शालेय विद्यार्थ्यांना तब्बल १० टन गुळाचे वाटप‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ ।‎ साखर तयार करण्यासाठी रसायनांचा‎ वापर केला जातो, त्यामुळे ती‎ मनुष्यासाठी घातक आहे. त्याउलट गुळ ‎आरोग्यवर्धक असल्याने जामनेर येथील ‎प्रफुल्ल लोढा यांनी जामनेरसह पहूर‎ येथील शाळांमध्ये तब्बल १० टन‎ गुळाचे वाटप केले.‎

पित्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ‎अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचा अपघाती‎ मृत्यू होणे ही प्रचंड दुख:दायी बाब. मात्र, संसाराचा रहाटगाडा चालवायचा असेल‎ तर त्यातून सावरलेच पाहिजे, हा‎ नियतीचा नियम आहे. अशाच प्रसंगातून‎ सावरत जामनेर येथील प्रफुल्ल लोढा‎ यांनी नातवाच्या नावे विविध उपक्रम‎ राबवून सामाजिक कार्य हाती घेतले‎ आहे. त्यापैकीच गुळ वाटप हा एक‎ उपक्रम नुकताच त्यांनी राबवला. साखर‎ मनुष्यासाठी घातक आहे, याची प्रचिती‎ ‎आल्यानंतर स्वत:च्या शेतातील नैसर्गीक‎ पद्धतीने उत्पादन केलेल्या उसापासून व‎ नैसर्गीक पद्धतीनेच बनवलेल्या तब्बल‎ दहा टन गुळाचे त्यांनी पहूर, जामनेर‎ येथील जिल्हा परिषद शाळा, जामनेर‎ येथील लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलसह‎ अन्य शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन प्रत्येकी दोन किलो याप्रमाणे‎ वाटप केले. लॉर्ड गणेशा स्कूलमध्ये गुळ‎ वाटप करताना संस्थेचे सचिव अभय‎ बोहरा, बाळू डांगी, सुमित जोशी,‎ प्रफुल्ल लोढा उपस्थित होते. दरम्यान,‎ वर्षभर प्रफुल्ल लाेढा हे नानाविध उपक्रम‎ राबवत असतात.‎