जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय चिंतेचा बनत आहे. अशातच जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, चिंचखेडा तवा येथील भागवत राजाराम साठे (वय ३५) या शेतकऱ्याकडे साडेचार एकर जमीन आहे. त्यांनी एचडीएफसी बँकेसह अन्य ठिकाणांहून कर्जाची उचल केली होती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असतांनाच, कर्जवसुलीसाठी तगादा सुरू होता.
त्यामुळे साठे यांनी कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांनो काळजी घ्या! 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार, IMD चा अंदाज
- TVS ची लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक भारतात लाँच ; किंमत अन् फीचर्सबद्दल जाणून घ्या
- जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी
- ऑनलाईन पेक्षा स्वस्त आयफोन जळगावात; iPhone 13 मिळवा फक्त ४० हजार रुपयात
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस उत्साहात संपन्न