सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

फेब्रुवारी 17, 2022 9:59 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय चिंतेचा बनत आहे. अशातच जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

bhagwat sathe jpg webp

याबाबत असे की, चिंचखेडा तवा येथील भागवत राजाराम साठे (वय ३५) या शेतकऱ्याकडे साडेचार एकर जमीन आहे. त्यांनी एचडीएफसी बँकेसह अन्य ठिकाणांहून कर्जाची उचल केली होती. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असतांनाच, कर्जवसुलीसाठी तगादा सुरू होता.

त्यामुळे साठे यांनी कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. घटनेच्या वेळी घरात कोणीही नव्हते. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now