⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

खान्देशवासियांसाठी खुशखबर : सूरत आणि नंदुरबारसाठी विशेष अनारक्षित रेल्वे सुरु करण्याचा निर्णय

0
new-trains-from-bhusawal-to-surat-and-nandurbar

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबारसाठी विशेष अनारक्षित रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे खान्देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार विशेष रेल्वे पूर्णपणे आरक्षित विशेष गाडीचे परिचालन सुरु करण्यात आले होते. मात्र याच क्रमामध्ये रेल्वे प्रशासन द्वारा यात्री सुविधे करिता पुढील सूचना मिळेपर्यंत आरक्षित विशेष गाडीच्या बदल्यात अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

गाडी क्रमांक -09077 / 09078 अप डाऊन भुसावळ-सूरत आणि गाडी क्रमांक -09007 /09008 अप डाऊन  भुसावळ-नंदुरबार , ज्यामध्ये केवळ सामान्य श्रेणीचे डबे अनारक्षित मानले जातील. गाड़ी क्रमांक-09077/09078 भुसावळ ते  सुरत करीता  मेल एक्सप्रेस चे  भाडे (किराया ) राहील आणि  गाड़ी क्रमांक – 09007/09008  भुसावळ -नंदुरबार करीता  पॅसेंजर भाडे  (किराया) लागू राहील .

गाड़ी क्रमांक-09077/09078 अप/डाउन  भुसावल-सूरत और गाड़ी क्रमांक – 09007/09008 अप/डाउन  भुसावळ-नंदुरबार मध्ये  स्लीपर क्लासचे ३ कोच  आरक्षित असतील व उर्वरित कोच अनारक्षित असतील.

 

सध्या या गाड्यांसाठीच अनारक्षित  तिकिटे दिली जातील, या गाड्या वगळता इतर कोणत्याही गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे दिली जाणार नाहीत. सर्व प्रवाशांनी नेहमीच  सामाजिक अंतर सुनिश्चित केले पाहिजे, मास्क  घालावे आणि कोविड १९  च्या निर्धारित नियमांचे पालन  करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे .

वनमंत्री संजय राठोडांचा राजीमाना राज्यपालांनी मंजूर केल्याने भाजपतर्फे फटाके फोडून जल्लोष

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयित वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग केशरी यांनी मंजूर केल्याने भाजपातर्फे आज वसंत स्मृती जिल्हा कार्यालय येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

 

यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे अध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, म.न‌.पा च्या महापौर सौ भारती ताई सोनवणे, महानगर सरचिटणीस महेश जोशी, उपाध्यक्ष श्री चंदन महाजन, प्रदीप रोटे, राजेंद्र मराठे, सौ शरीफा ताई तडवी, चिटणीस महेश चौधरी, भगतसिंग निकम (सर) जिल्हा महानगर सोशल मीडिया चे अक्षय चौधरी, कार्यालयीन मंत्री श्री प्रकाश पंडित, ज्येष्ठ नगरसेवक  कैलाश आप्पा सोनवणे,  दत्तु कोळी, नगरसेविका सौ पार्वता ताई भिल, मंडल क्र.६ चे अध्यक्ष श्री अजित राणे, जिल्हा महानगर युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री आनंद सपकाळे, ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष श्री जयेश भावसार, ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री प्रमोद वाणी, श्री अतुल बारी, श्री दीपक पाटील, श्री अमित शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद चौधरी , युवा मोर्चा चिटणीस सागर जाधव, जयंत चव्हाण, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख भुषण जाधव, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष रत्नेश निकम कार्यालयीन कर्मचारी गौरव सणस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळातील रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार ; दोघांचे हात फॅक्चर

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, खराब रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार झाले असून दोघांच्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे.

डि.आर.एम कार्यालयातील कार्मिक विभागमधील मेडीकल विभागाचे चीफ ओएस गुलाब सोनवणे व सिनियर क्लर्क अविनाश सोनवणे हे मोटार सायकलवरुन जळगांवहुन भुसावळला येत असतांना भुसावळातील भोई नगर जवळ रस्त्यावर कच पडलेला असल्याने अविनाश सोनवणे यांची मोटार सायकल कच वरुण घसरल्याने दोन्ही जण मोटार सायकल वरुन खाली पडले. त्यात दोघांच्या हाताला व पायाला जबर मार लागल्याने त्यांना तेथिल नागरीकांनी त्वरीत  रिक्षामधून  रेल्वे  दवाखाण्यात दाखल केले, दोन्ही जण रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. हात व पाय फॅक्चर झाल्याने त्यांना प्लास्टर लावण्यात आले आहे.

शहरात रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली असून दररोज एक ना अनेक  अपघात होत आहेत रस्ते खराब असल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात अनेक ठिकाणी  पथदिवे सुद्धा नाहीत त्यामुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

…अन् जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत झाले भस्मसात

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जामनेर तालुक्यातील लोंढरी येथे गुरुवारी मध्यरात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गुरांच्या गोठ्यास विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठी पशूहानी झाली आहे. शेतकरी बांधवांनी जिवापाड जपलेले पशुधन डोळ्यादेखत  जळल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील शेतकरी अरूण शिवाजी पडोळ, शिवराम शिवाजी पडोळ, दिपक शिवाजी पडोळ, सुधाकर धनजी भागवत यांच्या गोठ्यामध्ये नेहमीप्रमाणे गाई -गुरे -म्हशी बांधलेले होते. गुरुवार दिनांक ४ मार्च २०२१ च्या मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये  एका गायीसह म्हशीची २ पारडू जळून भस्मासात झाले तसेच २ म्हशी डोळ्यात अंध झाल्या असून सुमारे १३ गुरे आगीमुळे होरपळली आहेत. या यागीत मानवी जीवीताची हानी झालेली नसली तरी शेतकऱ्यांचे ५ ते ८ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

गावकरी मोठ्या संख्येने आगीच्या दिशेने धावले. मध्यरात्री तरूणांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . सर्व जण आपापल्या परीने हंडा -बादलीच्या साहय्याने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल खताळ, बीट हवलदार शशिकांत पाटील आदी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पहाटे पर्यंत धुराचे लोट सुरू होते .पोलीस निरीक्षक राहुल खताळ आपल्या सहकाऱ्यांसोबत तीन तास ठाण मांडून होते. जामनेर नगर परिषदेच्या अग्नीशामन दलासही  पाचारण करण्यात आले . अग्नीशमन दलाच्या २  गाड्या आल्या खऱ्या, परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . अखेर  अग्नीशमक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले .

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . राठोड, जामनेरचे कृषी वैद्यकिय अधिकारी , तसेच पहुरचे तायडे यांनीही गुरांवर उपचार केले  प्रचंड भितीदायक वातावरण होते . शेतकरी आधीच अनेक संकटांना सामोरे जात आहेत. त्यातच अशा घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थरातुन हळहळ व्यक्त होत आहे.

आता आग शमली असली तरी जखमी झालेली जनावरे मरण यातनांनी विव्हळत आहेत. गोठ्यात फक्त शिल्लक राहिली आहे राख अन् कोळसा. गोठ्या कडे पाहिल्यावर वाटते भय इथले संपत नाही; अशीच स्‍थिती होत आहे.

मेहरूण तलावाजवळ अपघात; दोघे जखमी

0
midc-police-station-jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । मेहरूणतलावाजवळी श्रीकृष्णा लॉन येथे दुचाकीने जाणाऱ्या दोघांना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, निसार शेख इसाक खाटीक (वय-३६) रा. गुलाबबाबा कॉलनी मेहरूण रोड आणि रिझवान सैय्यद असे दोघेजण दुचाकीवरून जात होते. त्यांना १२.१५ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या दुचाकीधारकाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील निसार शेख आणि रिझवान सैय्यद हे दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाले.

दरम्यान, धडक देणाऱ्या दुचाकीवर तीन जण बसल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी निसार खाटीक यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहेत.

केंद्रीय जीएसटी पथकाची पहूरला धाड; स्टील कंपनीच्या पत्त्यावर होते मेडिकल!

0
GST-scam

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे वस्तू व सेवाकर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या पथकाने धाड टाकली आहे. दरम्यान यावेळी केलेल्या चौकशीत एका स्टील कंपनीच्या पत्त्यावर मेडिकल सुरु असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी कि, जीएसटी घोटाळ्याशी संबंधित हे धाडसत्र होते. त्यानुसार एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरु असल्याचे आढळून आले. तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. दरम्यान, याप्रकरणी डीजीजीआयच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असल्याचे कळते.

आयकर भरणारे एम/एस कृष्णा स्टील (GSTIN 27BXRPK1228BIZM) आणि ए.एस. स्टील (GSTIN 27KENPS0948A1Z5) या दोघं कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा १३७३, संतोषी माता नगर पहूर पेठ, पहूर असा होता. अधिकाऱ्यांनी कृष्णा स्टीलचे मालक प्रवीण विठ्ठल कुमावतशी मोबाईलवरून संवाद साधला. तेव्हा त्यांना कळले की, ए.एस स्टीललॅडचे अशोक सखाराम सुरवाडे हे मालक आहेत. अधिकाऱ्यांनी प्रवीण कुमावतची चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, कृष्णा स्टील ही फर्म पिंटू इटकारेने माझ्या नावावर तयार केली. तसेच या मोबदल्यात त्याने मला ८ महिने ८ ते १२ हजार रुपये महिना देत होता.

दरम्यान, अशोक सुरवाडे याने अधिकाऱ्यांना सांगितले की, ए.एस स्टील या कंपनीचा संचालक असल्याबाबत बाबत आपल्याला काहीच माहित नाही. तर कैलास भारुडे याने सांगितले की, तो साई इंटरप्राईजेसचा संचालक आहे. परंतू ही फर्म त्याचा शालक पिंटू इटकारे याने बनविली होती. भारुडेने पुढे सांगितले की, सुरेशचंद्र हुकुमचंद्र जाधवानी हा सर्व कटाचा मुख्य लाभार्थी तसेच मुख्यसूत्रधार आहे. तसेच पिंटू हा जाधवानी आणि ओम प्रकाश सचदेव यांच्या सुचनेनुसार सर्व काम करत होता.

छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कोरोना लसीकरणाला सुरुवात

0
corona-vaccination-starts-in-shahu-maharaj-hospital-jalgaon
कोरोना लस घेतांना महापौर भारती सोनवणे

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । शहरातील छत्रपती शाहू महाराज सरकारी रुग्णालयात शुक्रवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापौर भारती सोनवणे यांनी देखील लस घेतली. जेष्ठ नागरिक आणि इतर पात्र नागरिकांना लस दिली जात आहे.

कोरोना लसीकरणाला सर्वत्र सुरुवात झाली असून मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात मोफत लसीकरणाला महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे. ६० वर्ष वयोगटावरील आणि ४५ ते ६० गटातील गंभीर आजार असलेल्या रुग्णांना लस दिली जात आहे.

द्वितीय डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य

दररोज २०० नागरिकांना लस दिली जाणार असून नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नोंदणी केलेल्या नागरिकांनंतर दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. लसीकरणाला येताना नागरिकांनी ओळखीचा पुरावा आणि ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना ओळखीचा पुरावा आणि आपल्या आजारा संदर्भातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

सकाळी ९ ते ५ लसीकरण

छत्रपती शाहू महाराज कोविड लसीकरण केंद्रात सुसज्ज प्रतीक्षा आणि नोंदणी केंद्र, लसीकरण कक्ष, निरीक्षण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणानंतर नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास तात्काळ उपचारासाठी बेडची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत लसीकरण केले जाणार असून नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लसीकरण यशस्वी करण्यासाठी मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी परिश्रम घेत आहे.

भुसावळातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । भुसावळ  शहरात अमृत योजनेच्या जलवाहिनीमुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. तसेच ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान,  शहरातील रस्त्याच्या कामाला गती आली असून प्रभाग क्रमांक 19 मधील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे राहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

 

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत रस्ते गुळगुळीत करण्याचे आश्वासन देऊन भाजपने पालिकेची सत्ता काबीज केली. मात्र गेल्या चार वर्षात  रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्यामुळे शहर वर्षांमध्ये  तीव्र नाराजी व्यक्त केली होती.  यात मुख्य अडथळा हा अमृत योजनेचा असल्याने रस्त्याचे काम रखडले होते. मात्र आता 90 टक्के काम पूर्ण झाले असून आता शहरात रस्त्याच्या कामाला गती आली आहे.

 

नगरसेवक पिंटू कोठारी यांच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये देखील रस्ते डांबरीकरण सुरू झाले आहे. या प्रभागात महामार्गापासून वांजोळा रोड, केळकर हॉस्पिटल, आकाश फोम, श्रीराम मंदिर पासून काशी विश्वेश्वर मंदिर, हनुमान नगर, श्रीरामनगर या भागात डांबरीकरण केले जात आहे. चार ते सहा महिन्यात संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल याच्या निविदा देण्यात आल्या असून संपूर्ण रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. काही ठिकाणी नळजोडणीचे काम बाकी असून नळ कनेक्शनसाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असून मधील भाग सोडून सर्व प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व रस्त्याचे काम केले जाणार आहे. असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सांगितले. भाजप माजी शहराध्यक्ष पुरूशोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, डॉ.आजनालकर, डॉ. किरेंगे, ठाकूर काका, निलेश वानखेडे, मोद सरोदे भाऊ, गुड्डू सोनार, कॉन्ट्रॅक्टर बढे, डॉ. आशुतोष केळकर, वॉर्डतील जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात २२ मार्च, २०२१ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्ता लोकांचा जमाव करण्यास संबंधित भागातील पोलीस प्रभारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नसल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.