⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जुनी लफडी डोकं वर काढणार; जाणून घ्या शनिवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल?

0

मेष
अत्यंत महत्त्वाच्या मित्राशी भेट होईल. परीक्षा किंवा एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन सहकारी भेटतील. कुणाच्याही सांगण्यावर जाऊ नका. नाही तर व्यापारात बाधा येऊ शकते. गीत,संगीत, कला आणि अभिनयाशी संबंधित लोकांना विशेष यश मिळेल. नव्या उद्योगाची योजना यशस्वी होईल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात सावध राहा. एखाद्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने सरकारी क्षेत्रात प्रभाव वाढेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल.

वृषभ
आज तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीला एखादी वाईट बातमी ऐकायला मिळेल. कार्यक्षेत्रात प्रियजनांची साथ मिळेल. व्यापारात प्रगती होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. परदेशी जाण्याचा योग आहे. तुमच्या व्यक्तीगत समस्या तात्काळ सोडवा. कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. नोकरदारांना आजचा दिवस चांगला जाईल. आज खरेदीत अधिक खर्च होईल.

मिथुन
आज संतान सुख मिळेल. जुन्या मित्रांकडून शुभ समाचार ऐकायला मिळेल. धार्मिक कार्यात रस घ्याला. आज तुम्हाला महत्त्वाच्या कामांची जबाबदारी मिळू शकते. नोकरीतील आजचा दिवस चांगला जाईल. सहकाऱ्यांची साथ मिळेल. तंत्रज्ञानाशी संबंधिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज नवा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यापारात नवीन साथीदार मिळतील. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. पण काहीशी किरकीरही जाणवेल. राजकारण्यांची महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. बेरोजगारांसाठी आज दिवस त्रासदायक असेल. रोजगारासाठी इकडे तिकडे भटकावे लागणार आहे.

कर्क
कार्यक्षेत्रात नव्या लोकांचं सहकार्य आणि सानिध्य लाभेल. महत्त्वाच्या कार्यात कठोर मेहनतीनंतर यश मिळेल. नोकरीत उच्च पदस्थांना आज लाभ मिळेल. तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा, नाही तर मोठी किंमत चुकवावी लागेल. कृषी आणि पशुपालन करणाऱ्यांना मोठा सन्मान मिळेल. विदेशात नोकरीसाठी जाण्याचा योग आहे. एखादं अपूर्ण कार्य पूर्ण केल्यावर मनोबल उंचावेल.

सिंह
कार्य क्षेत्रात बऱ्याच सुधारणा घडवून येतील. त्यामुळे अनेक समस्या दूर होतील. व्यापार क्षेत्रातील लोकांनी नियोजनबद्ध काम केल्यास लाभ होण्याची शक्यता आहे. एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्याने मन प्रसन्न होईल. आत्मबळ वाढेल. रोजगाराचा शोध घेणाऱ्यांना आज आनंद वार्ता मिळेल. त्यांचा रोजगाराचा शोध संपेल. राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तीचं मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना मित्र मैत्रीणी भेटतील. अभ्यासात रुची वाढेल.

कन्या
राजकारणातील लोकांनी आज जीभेवर नियंत्रण ठेवावं. नाही तर अनेक गोष्टी बिघडू शकतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं सानिध्य लाभेल. कुटुंबात आजचा दिवस चांगला राहील. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रेमीयुगलांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाईल. वाहन खरेदी करण्याची इच्छा आज पूर्ण होईल. अभिनय क्षेत्राशी संबंधितांना आजचा दिवस अत्यंत लाभकारी असणार आहे. जुनी लफडी डोकं वर काढतील. प्रेमी युगलांचा भांडाफोड होईल.

तुळ
एखादी महत्त्वकांक्षा पूर्ण होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. विशिष्ट व्यक्तीचं मार्गदर्शन आणि सानिध्य प्राप्त होईल. उद्योगात भागीदारी असेल तर सावध राहा. घाटा होण्याची शक्यता आहे. वादविवाद करणं टाळा. आज प्रकृतीच्या समस्या जाणवतील. बाहेरचं खाणं टाळा. मित्रांना भेटणं टाळा. खरेदीचा योग आहे. अधिक खर्च करू नका.

वृश्चिक
आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य आणि उन्नतीचाही असणार आहे. वैयक्तिक आयुष्यात मोठे निर्णय घ्याल. विदेशात जाण्याचा योग आहे. किंवा लांबचा प्रवास संभवतो. देणेकरी त्रास देतील. उधारी देऊन टाका. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यापारात बदल केल्याने लाभ होईल. व्यापारातील अनेक निर्णय पथ्यावर पडतील. कुणालाही दुखवू नका. सर्वांना सोबत घेऊन चालल्यास फायदा होईल.

धनु
व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्याल. त्यामुळे फायदाच होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळीच डॉक्टरकडे जा. नवदाम्पत्यासाठी आजचा दिवस धावपळीचा जाईल. घरी पाहुणे येण्याची शक्यता. खरेदी विक्रीच्या भानगडीत पडू नका. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना परदेशात जाण्याचा योग आहे.

मकर
आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे. शेतीच्या कामाला लागाल. कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दानधर्मात दिवस जाईल. चार पैसे खर्च होतील. जमीनजुमल्याशी संबंधित प्रकरणं मार्गी लागतील. घरात मोठेपणा मिळेल. तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. पत्नीशी वाद होईल. मुलाशी पटणार नाही.

कुंभ
कोर्ट कचेरीच्या प्रकरणात आज तुमच्या बाजूने निकाल येऊ शकतो. त्यामुळे आनंदाचा दिवस जाईल. गावाकडे जाण्याचा योग आहे. जुने मित्र भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. घरातील धार्मिक कार्यात भाग घ्याल. एखादी जमीन किंवा वाहन खरेदी कराल. एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. गाडी हळू चालवा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. विनाकारण कुणावर भडकू नका. रागावर नियंत्रण ठेवा.

मीन
कार्यक्षेत्रात अनेक संघर्षानंतर आज चांगला फायदा होणार आहे. नोकरीतून महत्त्वाच्या पदावरून हटवलं जाण्याची शक्यता आहे. राजकारणात असाल तर तुमच्यावर आज चिखलफेक होऊ शकते. खोटे आरोप केले जाऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना पत्नीचा सल्ला घ्या. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सोयऱ्याधायऱ्यांशी चर्चा करा. पूर्ण विचार केल्याशिवाय व्यापारात कोणताही बदल करू नका. नाही तर मोठी अडचण होऊ शकते.

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये उद्या तडजोडपत्र प्रलंबित खटले मिटवुन घेण्याची संधी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । वर्षानुवर्षे ऐनकेन कारणाने प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपुर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत दि. २७/०७/२०२४ रोजी आयोजित करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे देण्यात आली. याचा अधिकाधिक लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आले आहे.

लोकन्यायालय म्हणजे काय? वाद उद्भवला तर तो शक्य तोवर सामंजस्याने सोडवावा ही आपली प्राचीन परंपरा आहे. गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येत आणि कोणत्याही व्यक्तींमध्ये उद्भवलेला वाद समजुतीने मिटवत. ज्यांच्यापुढे वाद जाई ते गावातील आदरणीय आणि निष्पक्षपाती लोक असत. त्यालाच गावात गावपंचायत असे म्हणत सध्याचे लोक न्यायालय म्हणजे या गावपंचायतीचे आधुनिक रूप जेथे कायदा जानणाऱ्या निष्पक्षपाती लोकांचे न्याय मंडळापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडविते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे सांगण्यात आले की, मा. ना. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हात या लोकअदालतीचे आयोजन केलेले असुन विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व जिल्हा वकील संघ, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी ही राष्ट्रीय लोकअदालत जळगांव जिल्हातील संपुर्ण न्यायालयात आयोजीत केली जाईल. जळगांव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. क्यु. एस. एम. शेख साो. तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन ट्रॉफीक चलान, भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले इ. चे व खटला दाखल पुर्व प्रकरणे तसेच एकुण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय लोकअदालतीचे फायदे असे की, निकाल झटपट लागतो, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात, निकाल झटपट लागतो, लोकन्यायालयाच्या निवाडया विरूध्द अपील नाही एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने कोणाचा ना जय होतो, ना हार होते, लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुता ही निर्माण होत नाही, कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाडयाची अमंलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होते, लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायदयानुसार कोर्ट फि ची रक्कम मिळते.

त्याचप्रमाणे जळगांव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोड योग्य प्रकरणे देखिल त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्हातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपनी यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वणी कंपन्या, दुरध्वणी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्थावित केलेले आहे.

ज्या पक्षकारांना तडजोडीने सदरचे आपली प्रकरणे निकाली काढायची असतील अशा संबंधीत सर्व पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवायचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, व जास्तीत जास्त खटले दि २७/०७/२०२४ रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत समोपचाराने निकाली करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे करण्यात आलेले आहे.

मुसळधार पावसामुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातही अतिवृष्टी झाली असून यामुळे सुरत- भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाचा बोजवरा उडाला आहे.

गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चिंचपाडा रेल्वे स्थानक परिसरात रुळावर पाणी व मातीचा भराव वाहून आल्याने यात मालवाहू गाडी अडकल्याने सुरत- भुसावळ रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रुळावर वाहून आलेला मातीचा भराव काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आले आहे.

चिंचपाडा रेल्वे स्थानकाजवळ महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या पुलाखाली रेल्वे मार्गाला कोणतीही संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून आले. तसेच पाण्यासोबत मातीचा ढिगारा देखील वाहून आला आहे. त्यामुळे (Railway) रेल्वे रुळावर पाणी मोठ्या प्रमाणात साचले त्यासोबत रेल्वे रुळावर माती आल्याने रेल्वे रुळ माती खाली गेल्याने रेल्वे मालगाडी रेल्वे रुळावर चिंचपाडा गावाजवळ अडकल्याने सुरत भुसावळ रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी या मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या या विविध स्टेशनवर थांबून आहेत. गेल्या तीन ते चार तासांपासून रेल्वेची वाहतूक झाली आहे बंद आहे.

इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा राजश्री कात्यायनी यांचा गोदावरीतर्फै सत्कार

0

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या १० वर्षांपासून बँक ऑफ बडोदा, वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दि.२० जुलै रोजी रोटरी क्लब ऑफ भुसावळ, इनरव्हील क्लब भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात असून दशकपुर्तीनिमीत्‍त इनरव्हीलच्या अध्यक्षा राजश्री कात्यायनी यांचा आज गोदावरीतर्फे सत्कार करण्यात आलाृ.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोटेरियन ब्रह्मदत्त शर्मा गोदावरी फाऊंडेशन रक्तपेढी सुरुवातीपासून कार्यरत आहे. गेल्या १० वर्षात ३०० पेक्षा जास्त बॅगचे रक्तसंकलन शिबिरातून करण्यात आले आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. राजश्री कात्यायनी यांचा सत्कार गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून करण्यात आला.

यावेळी श्री. विकास कात्यायनी तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक (व रोटरी क्लब ऑफ भुसावळचे माजी अध्यक्ष) डॉ. एन. एस. आर्विकर हे उपस्थित होते. या कामी रोटरी क्लब ऑफ भुसावळ व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.

गोदावरीच्या श्रीवत्स निगम याची न्यूयॉर्क यूएसए येथे मास्टर ऑफ सायन्स (एम एस) साठी निवड

0

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकीतील संगणक विभागाचा श्रीवत्स निगम ची मास्टर ऑफ सायन्स एम.एस. अभ्यासक्रमासाठी नुकतीच निवड झाली आहे.

श्रीवत्स हा परदेशात प्रवेश मिळवण्यासाठी पहिल्यापासूनच प्रयत्नशील होता. त्याने अमेरिकेतील विविध विद्यापीठातील महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षा दिल्या होत्या. त्यापैकी आई इ एल टी एस या प्रोइफिशियन्सी टेस्ट मध्ये त्याने दैदीप्यमान यश संपादन केले. त्यामुळे त्याला बिंगहॅमटन स्टेट युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क, यूएसए येथे सिस्टीम सायन्स या मास्टर ऑफ सायन्स (एम एस) प्रोग्राम साठी प्रवेश मिळाला.श्रीवत्स निगमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन व सत्कार केला.

कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ. विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर), प्रा.निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख) डॉ. नितीन भोळे (बेसिक सायन्सेस अँड हुम्यानिटीज प्रमुख), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स प्रमुख), प्रा. महेश पाटील (विद्युत विभाग प्रमुख) तसेच प्रा. निलेश चौधरी, प्रा. प्रशांत शिंपी हे उपस्थित होते. श्रीवत्सच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील(सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य) तसेच डॉ. वैभव पाटील (डी. एम. कार्डिओलॉजी) यांनी अभिनंदन करून कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील आणि सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Breaking : 50 हजारांची लाच स्वीकारतांना भडगाव पोलीस स्टेशनचा हवालदार जाळ्यात

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । लाचखोरीची एक मोठी बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती ५० हजारांची लाच स्वीकारतांना भडगाव पोलीस स्टेशनच्या हवालदाराला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी रंगेहात अटक केली. किरण रविंद्र पाटील (वय 41) असे लाचखोर हवालदाराने नाव असून या करवाईने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.

काय आहे प्रकार?
भडगाव शहरातील 28 वर्षीय तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापूर्वी भडगाव पोलिसात अवैध वाळू वाहतूकी संदर्भात दोन गुन्हे दाखल आहे. तक्रारदार यांना सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 25 रोजी आरोपी हवालदाराने दोन लाख 60 हजारांची लाच मागितली होती.

या बाबत तक्रारदार यांनी तक्रार दिली होती. लाचेतील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचासमक्ष 50 हजार रुपये घेताना हवालदार किरण पाटील यास आज शुक्रवारी सकाळी 10 वाजता अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

मुक्ताईनगरात शिंदे गटाचे शेकडो युवक-कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । मुक्ताईनगर येथील शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणी खडसे यांनी या युवकांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यांचा झाला पक्षप्रवेश?
यामध्ये दिपक चिंचोले(बाळा भाऊ), निलेश भारसाके,सलमान पिंजारी,अरमान पिंजारी, समीर पिंजारी, दर्शन ठाकुर,शुभम ठाकुर, रोशन झांबरे,योगेश माळी, रुपेश कवळे,योगेश जुमळे, मयुर हळपे,आशिष राजपुत, मयुर चव्हाण,मजीद शाह, ओम जुमळे,धिरज जुमळे,संतोष कवळे, स्वप्निल आवारे, ईशान बोराखडे,नारायण फिरके, संतोष धनगर,रहेमान पिंजारी,भावेश बागवान, विलास मराठे,कैलास मराठे,महेंद्र सपकाळे,अमोल सपकाळे,योगेश जुमळे,लोकेश पाटिल, ओम माळी यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या .शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माला घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे. कितीही वादळे संकटे आले तरी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अखंड वाटचाल सुरु आहे. तुम्हा सर्वांचे मी पक्षात स्वागत करते सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल

येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मुक्ताईनगर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे त्यासाठी पक्षाला आपले कुटुंब मानुन सर्वांनी एकजुटीने पक्ष विस्तारासाठी मेहनत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे, कार्य सर्वसामान्यां पर्यंत पोहचवा असे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, प्रदिप साळुंखे, बापु भाऊ ससाणे, संजय कोळी, संदीप जुमळे, राहुल पाटिल, चेतन राजपुत, जितेंद्र पाटिल, निलेश भालेराव,विजय शिरोळे, अजय अढायके,राहुल बोदडे,रोहन महाजन उपस्थित होते.

जळगावच्या एलसीबीची नांदेडमध्ये धडक कारवाई; लाच घेताना अधिकारी रंगेहात पकडले..

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यात धडक कारवाई केली. ९ हजाराची लाच घेताना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला रंगेहात अटक केली. भूषण जवाहर राठोड (वय ३४) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सापळा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, नाईक किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे यांनी यशस्वी केला आहे.

याबाबत असे की, २२ वर्षीय तक्रारदाराची गुरुकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, नांदेड जिल्ह्यात आहे. या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकांना परवाना काढण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रायल मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालया, नांदेड येथे अनुत्तीर्ण करण्यात आले होते. त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी म्हणून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक भूषण जवाहर राठोड यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.

दरम्यान तक्रारदाराने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गुरुवार दि. २५ जुलै रोजी विभागाने पडताळणी केली असता तक्रारदारांकडून तडजोडीअंती ९ हजाराची लाच स्वीकारताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड यांना रंगेहात अटक करण्यात आली त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र्रात पावसाचा धुमाकूळ ! आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

0

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२४ । राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाची रिपरिप सुरु असून ही पावसाची रिपरिप आणखी पुढील दोन दिवस अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे

आज कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

उर्वरित राज्यामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, 27 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात पावसाची रिपरिप :
जळगाव जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरु आहे. दरम्यान, २७ जुलैपर्यंत असाच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. सूर्यदर्शन क्वचितच होईल. त्यानंतर पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता. दरम्यान, २७ जुलैपर्यंत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन अत्यल्प प्रमाणात राहील. त्यामुळे वातावरणात काहीसा गारठा निर्माण होणार आहे. १ ऑगस्टपर्यंत ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची अधूनमधून शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.