⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

सावदा येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात

0
corona vaccination begins at sawda

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । सावदा परिसरातील असलेल्या ग्रामीण रुग्णालयात सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरवात झाली आहे.

सावदा शहरात कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत होते. हीच मागणी लक्षात घेता सावदा येथील ग्रामीण रुग्णालयात दि 15 पासून व्हेकसिनेशन सुरू करण्यात आल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी बोलतांना दिली यात फ्रंटलाईन वर्कर, जेष्ठ नागरिक, 45 वर्षावरील गंभीर आजार असलेले आदींना येथे लस देण्यात येत आहे, यावेळी परीचारका एच पी भांगाळे, अधीपरिचारिका सी एम कोल्हे, एस, एम, धनगर, एस,आर पाल आदींनी नागरिकांचे लसीकरण केले दरम्यान पहिल्याच दिवशी सुमारे 28 जणांनी दुपारी 2 वाजे पर्यंत लस घेतली.

तर येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी देखील दररोज होत असून दि 15 रोजी 50 जणांचे टेस्टिंग झाल्या यात 5 जण पीजेटीव्ह आले रुग्णांना रावेर येथे कोविड सेंटरला पाठविण्यात येत आहे.

दरम्यान पहिल्या दिवशी माजी नगराध्यक्षा ताराबाई गजाननराव वानखेडे यांनी देखील लस घेतली लस घेतल्यावर सदर लस पूर्णपणे सुरक्षित असून शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांनी ही लस घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

रस्ता लूट करणारा तिसरा संशयीत जेरबंद !

0
crime (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । पिस्तुलाचा धाक दाखवत 15 लाख रुपये असलेली बॅग हिसकावून फरार होणाऱ्या दोन चोरट्यांना बेड्या ठोकण्यात आल्यानंतर आता त्यांच्या तीसऱ्या साथीदारास देखील आज सोमवारी अटक करण्यात आली. अविनाश सुरेश माने ( वय १९, रा. दगडीचाळ, धुळे) असे अटक केलेल्या तीसऱ्या संशयिताचे नाव आहे. या तीघांकडून आत्तापर्यंत २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

1 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ महेश महेश चंद्रमोहन भावसार हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलसह 15 लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील बॅग हिसकावत पलायन केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान दोन चोरट्यांची नावे निष्पन्न झाली होती. त्या दोन चोरट्यांच्या शोधात दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींच्या शोधात धुळे, सूरत, पुणे व उल्हासनगर आदी ठिकाणी तपास पथक रवाना करण्यात आले होते. अखेर उल्हासनगर येथे खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपूत या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून ते एमआयडीसी पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी अधिक तपास केला असता या दोघांनी अविनाश माने याच्या मदतीने मालेगाव शहरात देखील अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच भावसार यांच्याकडून लांबवलेल्या पैशांपैकी काही रक्कम माने याच्याकडे ठेवल्याचेही सांगीतले. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी मालेगाव येथे जाऊन माने यालाही ताब्यात घेतले. या तीघांच्या विरुद्ध धुळे, मालेगाव व नाशिक शहरात जबरी लुट, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच आधारावर माने यालाही अटक करुन मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, या तीघांनी आत्तापर्यंत लोकांकडून लुटलेल्या रकमेपैकी २० लाख ६१ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे.

या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक सचिन मुंडे, इमरान सैय्यद, मिलींद सोनवणे, सुधीर साळवे, संदीप पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांनी तपासकामी झोकून दिल्याने तपासात यश आले.

एरंडोलच्या प्रौढाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । एरंडोल शहरातील गांधीपुरामधील प्रौढाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरेश सखाराम कुदाळे (वय-४३) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत  एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुरेश कुदाळे हे गेल्या अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन होते. १४ मार्च रोजी सायंकाळी दारूच्या नशेत असतांना नदीच्या पाण्यात पडले, त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरेश कुदाळे यांना दारू पिण्याची प्रचंड सवय होती. त्यात दारूच्या नशेत आत्महत्या केली असावी असा अंदाज नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल पाटील हे करीत आहे.

संचारबंदीचे उल्लंघन ; चाळीसगावात बँड जप्त करत सात जणांवर गुन्हे दाखल

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । चाळीसगाव शहरात संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोरया बॅंड जप्त करत सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. 

चाळीसगाव शहरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. शहरात  १३ व १४ मार्च रोजी संचारबंदीचे आदेश लागू केली आहे. या दरम्यान,  शहरातील भडगाव रोड परिसरातील स्वयंवर मंगल कार्यालयासमोर रात्री ११ वाजेच्या सुमारास चक्क मोरया बॅंड (गडखांब ता. अमळनेर) सुरू होता. पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान ही बाब लक्षात येताच मोरया बॅंड ताब्यात घेत सात जणांवर शहर पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आले.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. सरकारी नियमानुसार संदीप ईश्वर पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.

 

होय… भाजपचे ३० नगरसेवक फुटले… कुलभूषण पाटलांसह ३३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

0
kulbhushan patil shivsena

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । चेतन वाणी | शहरातील भाजप, एमआयएमचे नगरसेवक कालपासून गायब असून सोमवारी सकाळी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी देखील जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जळगाव मनपात सत्तांतर करण्याच्या हालचाली जोरात सुरू असून मुंबईहुन सर्व सूत्रे हलवली जात आहे. जळगाव लाईव्ह न्यूजकडे भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून सर्व सूत्रे कशी हालली याची माहिती दिली आहे.

आठ दिवसांपूर्वी झाली मुख्यमंत्र्यांकडे बैठक

जळगावचे आमदार राजुमामा भोळे हे नेहमी दुजाभाव करतात, आमदार निधीतील कामे देत नाही, सर्वांना विश्वासात घेत नसल्याने कंटाळून काही भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. आठ दिवसापूर्वी नगरसेवक कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन देशमुख, सुधीर पाटील, कुंदन काळे यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर याबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी देखील याविषयी चर्चा करण्यात आली होती.

जयश्री महाजन महापौर, कुलभूषण पाटील उपमहापौर

शिवसेनेने खेळलेला डाव यशस्वी झाला तर शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे कुलभूषण पाटील हे उपमहापौर म्हणून निश्चित मानले जात आहे. भाजपातून शिवसेनेत जात असलेले भाजप नगरसेवक सध्या मुंबईत असून त्यांनी आमदारांबद्दल असलेली यापूर्वीच पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती. वरिष्ठांनी निर्णय न घेतल्याने त्यांनी गेल्या महिन्यात देखील मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची माहिती नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली आहे.

 हे देखील वाचा : 

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

महापौर निवडणुकीत ट्विस्ट : शिवसेनेने दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

जळगाव महानगरपालिकेत विरोधकांचा घोडेबाजार; गिरीश महाजनांची टीका

0
girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील राजकारण चांगलेच तापले असून नगरसेवक फुटीच्या भीतीने सत्ताधारी भाजप गोटात चांगलीच तारांबळ उडाली आहे. भाजपचे २० पेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेसोबत जात असल्याने सत्तानंतर होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यावरून माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी विरोधकांवर ‘घोडेबाजार’ सुरु असल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, जळगाव मनपावर सेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी शिवसेनेसह आघाडीकडून नवीन डाव खेळला जात आहे. भाजपचे २५ पेक्षा जास्त नगरसेवक तळाला लागले असल्याचे सेना नेत्यांनी स्पष्ट केले असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. यावर आ. महाजन म्हणाले की, जे गेले आहेत ते परत येतील. पक्षा विरोधात काम केल्यास सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई अटळ आहे, असेही ते म्हणाले आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्यावर काही नगरसेवकांची नाराजी असल्याबाबत बोललं जात आहे. यावर बोलताना गिरीश महाजन की होय… काही लोकांची नाराजी असू शकते… सर्वांचेच समाधान नाही होऊ शकत.. नाराजी चालूच असते मग राजुमामा बद्दल असो किंवा माझ्याबद्दल… तिथे राजूमामा उभे नाहीत, पक्ष उभा आहे.

सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नाही असा आरोप देखील होत आहे याबाबत स्पष्टीकरण देतांना आ. महाजन म्हणाले की विकासाचा मुद्दा नाहीच…आता अंडरग्राउंड ड्रेनेज झालेले आहे, पाणी पुरवठा योजना,100 कोटींच्या कामांची वर्क ऑर्डर झाली असून पुढील आठ पंधरा दिवसात कामे सुरु होतील त्यामुळे हा काही विषय नाही.

हे देखील वाचा:

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

आ.राजुमामा भोळेंमुळे फुटणार भाजप?

बिग ब्रेकिंग : जळगावात राजकीय उलथापालथ : माजी मंत्री आ.गिरीष महाजन मुंबई रवाना!

जामनेरात शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
launch of government shopping center at jamner

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । जामनेर शहरातील शेतकरी सहकारी संघाच्या आवारात तुर आणी हरबरा (चना) शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी काटा पुजन करून शुभारंभ केला.

आतापर्यंत तालुकाभरातुन सुमारे १६०० वर शेतकऱ्यांनी आपल्या मालाची ऑनलाईन नोंदणी केली असून तुरीला ६००० तर हरबरा ५१०० रूपये प्रती क्विंटलने खरेदी करण्यात येईल, अशी माहिती शेतकीसंघाचे सभापती चंद्रकांत बावीस्कर यांनी यावेळी दिली.

शुभारंभ प्रसंगी शेतकीसंघाचे सभापती चंद्रकांत बावीस्कर,उपसभापती बाबुराव गवळी तर संचालकांमधे डॉ सुरेश पाटील, रंगनाथ पाटील,रमेश नाईक, डॉ भरत पाटील, डोंगरसींग नाईक, बिरबलदादा पाटील, नाना पाटील, प्रभाकर पाटील, व्यवस्थापक गोपाळ पाटील यांचेसह शेतकरी-कर्मचारी उपस्थित होते.

महाजनांच्या ‘मैत्री’खातर ललित कोल्हे सेनेच्या वाटेवर!

0
lalit kolhe sunil mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहराचे माजी महापौर, सभागृह नेता ललित कोल्हे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केल्याने जयश्री महाजन यांची महापौर पदाची संधी हुकली आणि जिवलग असलेली कोल्हे-महाजन जोडी फुटली होती. दोघांमधील दुरावा दूर होण्याची संधी चालून आली असून सुनील महाजन यांच्या मैत्री खातर ललित कोल्हे पुन्हा घर वापसी करत सेनेचा धागा मनगटावर बांधणार असल्याचे निश्चित झाले आहे.

जळगाव शहरात ललित कोल्हे आणि सुनील महाजन या जोडीच्या मैत्रीची चर्चा नेहमी होत होती. सुनील महाजन यांच्या मैत्रीमुळेच ललित कोल्हे मनसेतून शिवसेनेत दाखल झाले होते. सेनेकडून उमेदवारी निश्चित झालेली असताना ऐनवेळी ललित कोल्हे भाजपात दाखल झाले आणि तिथेच मैत्रीत दुरावा आला. ललित कोल्हे यांच्यासह त्यांचे सर्व नगरसेवक सेनेत आल्याने सेनेची ताकद वाढणार होती आणि महापौर पदाच्या दावेदार मानल्या जाणाऱ्या जयश्री महाजन यांचे पद जवळपास निश्चित झाले होते. कोल्हे यांच्या प्रवेशाने केवळ शिवसेना नेतेच दुखावले नाही तर दोन मित्रांमध्ये दुरावा देखील निर्माण झाला होता.

मैत्रीची ऋण फेडण्यासाठी शिवबंधन

महाजन-कोल्हे जोडीत पडलेली फूट दूर करण्याची संधी नुकतेच चालून आली आहे. जळगाव मनपात सत्तांतरच्या चर्चा सुरू असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. भाजपचे अनेक नगरसेवक नॉट रीचेबल आहे त्यातच सेनेने महापौर पदाचा उमेदवार म्हणून जयश्री महाजन यांची उमेदवारी जाहिर केली आहे. आपल्या मैत्रीला जागण्याची हीच नामी संधी असून मैत्रीचे ऋण फेडण्यासाठीच ललित कोल्हे मनगटावर शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. ललित कोल्हे यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून त्यांच्या सूत्रांनी तशी माहिती जळगाव लाईव्ह न्यूजला दिली आहे.

अर्धांगिनीची भूमिका ठरली महत्वाची

माजी महापौर तथा भाजप मनपा सभागृह नेते ललित कोल्हे हे गेल्यावर्षीच शिवसेनेच्या सरिता माळी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले आहे. ललित कोल्हे जरी बाहेर शरीराने भाजपचे असले तरी घरी मात्र ते मनाने शिवसेनेचे होऊ लागले होते. ललित कोल्हे यांच्या शिवसेना प्रवेशासाठी आणि मैत्रीतील गोडवा पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी सरिता माळी-कोल्हे यांनीच महत्वाची भूमिका निभावली असे बोलले जात आहे.

उद्यापासून जामनेरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू ; काय खुलं, काय राहणार बंद?

0
jamner janta carfew

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जामनेर शहरात मंगळवार ते शुक्रवार असे 4 दिवसांचा “जनता कर्फ्यू”लागू करण्याचा निर्णय माजी मंत्री आ. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकित घेण्यात आला आहे.  

जामनेरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून चाचणी केलेल्या रुग्णांपैकी तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. ही परिस्थिती पहाता मंगळवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय रविवारी आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या सभेत घेण्यात आला.

या कॅर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. त्यात दवाखाने, मेडिकल, दुध डेअरी सुरु राहणार आहे. दूध डेअरी सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत उघडी राहणार आहे. उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत. याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

“जनता कर्फ्यू ‘मध्ये सर्व जामनेर शहर वासीयांनी स्वतःहून सहभागी व्हावे आणि कोरोना” विषाणूची संक्रमित साखळी तोडण्यासाठी योगदान द्यावे,असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.