⁠ 
शनिवार, मे 18, 2024

मुदत संपलेल्या गाळे ताब्यात देण्यासाठी लाच घेणारा अधिक्षक एसीबीच्या जाळ्यात

0
sanjay dhamal

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । एरंडोल नगरपालिका संकुलातील मुदत संपलेल्या गाळे द्यावे यासाठी दीड लाख रूपयांची लाख घेणाऱ्या लाचखोर कार्यालय अधिक्षकास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले गाळे लिलावामध्ये ताब्यात देवून इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधिक्षक संजय दगडू ढमाळ (वय-५१) रा. म्हाडा कॉलनी अमळनेर यांनी दोन लाख रूपयांची लाचेची मागणी केली होती.

याबाबत जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार आज लाचलुचपत विभागाने दुपारी सापळा रचून संशयित आरोपी संजय ढमाळ यांना तडजोड करून दीड लाख रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले.

ही कारवाई धुळे एसीबी उपअधिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम, सुधीर मोरे यांनी केली.

यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । यावल वन विभागाच्या कारवाईत धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने  तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला.

यावल वन विभागाच्यावतीने 10 मार्च, 2021 रोजी वनसंरक्षक, धुळे (प्रादेशिक), डी. डब्लु. पगार व उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव पद्मनाभा एच.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा व्ही.एच.पवार यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व्ही. व्ही. कुटे व वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा (प्रादेशिक) डी. एच. लोंढे व क्षेत्रीय कर्मचारी यांच्यासह शेख मुखतार शेख युसुफ रा. मन्यार मळी, हमीद नगर, चोपडा येथे गोपनीय पद्धतीने अचानक सकाळी 10 वाजता वरीष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळी जावून आकस्मित धाडसत्र राबिवले.

या धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने  तो जप्त करुन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा केला. तसेच 18 इंच व्यासाचे विना परवाना उभे आरायंत्र आढल्याने सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) चोपडा यांच्या समक्ष व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी, चोपडा (प्रादेशिक) यांच्या उपस्थितीत नियमांनुसार पंचनामा करुन ते जप्त करण्यात येऊन मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही केल्याने अवैध लाकूड व्यापारी तथा व्यवसायीकांमध्ये दहशत तयार झालेली असून या कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली. या कार्यवाहीनुसार वनगुन्हाची नोंद घेत पुढील तपास सुरु आहे. असे यावल वन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

जळगाव जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट 7.36%

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. 

याचाच एक भाग म्हणून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन अशा संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांच्या तपासणीवर भर देण्यात येत आहेत.  जेणेकरून कोरोनाची साखळी खंडीत करता येईल.

याकरीता जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विक्रमी 5 लाख 5 हजार 649 संशयित व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहेत. यापैकी 4 लाख 35 हजार 403 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 68 हजार 662 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

याचाच अर्थ जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट हा 7.36% इतका आहे.

शेतात दादर कपात असताना दिसले बिबट्याचे तीन पिल्ले आणि….

0
nandra forest area leopard calves

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्‍यातील नांद्रा परिसरालगतच्या वनविभागाला लागुन असलेल्या शेतात आज दादर पिकाची कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले असता त्या ठिकाणी त्यांना बिबट्याचे तीन छोटे पिल्ले आढळून आले आहे. बछडे आढळून आल्‍याने मजुरवर्ग काम सोडून पळाले.

पाचोरा तालुक्यातील नांद्रा शिवारा लगतचा जंगलाला लागून असणारा ताडमळ्यामध्ये शेतजामिन असणारे येथील संजय रामराव पाटील यांच्या मालकीच्या गट क्रं. १७५ च्या शेतात दि. १२ रोजी दादर कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले होते. यावेळी त्यांना शेतात तीन छोटे पिल्ले निदर्शनास आली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने भूषण तावडे व इतर शेतकरी यांनी तात्काळ ही गोष्ट वन विभागातील कर्मचारी यांना भ्रमणध्वनीवरून सांगितली,

त्यानुसार काही क्षणातच त्या ठिकाणी वन विभागाचे वन क्षेत्र पाल डि. एस. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील भिलावे, जगदिश ठाकरे, अमृता भोई, ललित पाटील, प्रकाश सूर्यवंशी, रामसिंग जाधव,राहुल कोळी,सचिन कुमावत यांचे पथक दाखल होऊन त्यांनी तेथेच त्या शेतात एका ठिकाणी तिघे पिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी छावणी केली जेणे करून बिबटी मादी येऊन त्यांना सुखरुप घेऊन जाईल व त्याठिकाणी संपूर्ण वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत व प्रसंगी राञीला नाईट व्हिजन कॕमेरा लावून नजर ठेवण्यात येणार आहे परंतु आद्याप शेतकरी वर्गाच्या जमिनीत अजूनही दादर, मक्का, गहू, कपासी असे पिके काढण्याचे असून त्यामुळे शेतात एकटे व्यक्ती, महिलावर्ग, किंवा बालके जाण्यास घाबरत असून पुन्हा एकदा संपूर्ण वनखात्यात वन विभागातील संरक्षण कंपाऊंडचा विषय ऐरणीवर आला आहे जर त्या जंगलाला कंपाऊंड करण्यात आले तर वन्य प्राणी गावाकडे वाटचाल करणार नाही व प्रसंगी अशा या अजून घडणाऱ्या हिँस्ञ घटना घडणार नाही. मागेही झाडावर बिबट्या चढण्याचं त्याबरोबरच गावालगतच्या शेताजवळ गाई वासरांचा फडशा पाडल्याचा घटना ताज्या असतानाच आताही हि बिबट्या मादी आपल्या पिलांना सोबत कुठपर्यंत या परिसरात घेऊन वास्तव्य करते किंवा निघून जाते यावर आता वन विभागाला बारीक लक्ष ठेवावे लागणार असून प्रसंगी रेस्क्यू ऑपरेशन ही करावे लागू शकते.

जळगाव कोरोना ब्रेकिंग : एकाच दिवसात ९८२ रुग्ण ! वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना तांडव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज जळगावात विक्रमी तब्बल ९८२ नवीन आढळून आले आहेत. दरम्यान, आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्रतेने जाणवत आहे. दुसऱ्या लाटेत आता रुग्णसंख्या जशी वाढत आहे, तसे मृत्यूही वाढत आहेत. पाच दिवसांपासून दररोज पाच-सहा रुग्णांचा बळी जात आहे. शुक्रवारी ५ जणांचा बळी गेला. त्यामुळे एकूण बळींचा आकडा १४३२ झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण ६८ हजार ६९२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६० हजार ५१७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६ हजार ७१३ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

जळगाव शहरात सर्वाधिक ३६३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-१९८, अमळनेर-१४, चोपडा-७४, पाचोरा-३०, भडगाव-१, धरणगाव-८, यावल-११, एरंडोल-४, जामनेर-४०, रावेर-१८, पारोळा-४७, चाळीसगाव-१४२, मुक्ताईनगर-४, बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकुण ९५४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आता जिल्ह्यात एकूण ६८,६६२ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे

0
sureshdada-jain-eknathrao-khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । हेडिंग वाचून असं वाटत असेल कि आम्ही जळगावकरांना ‘एप्रिल फुल’ करतोय. पण तसं काही नाहीये… अगदी खरंय… नाथाभाऊंची (Eknathrao Khadse) इच्छा होती कि सुरेशदादा (Sureshdada Jain) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे…

खान्देशात कोणाला पण विचारलं कि दुश्मनी कशी असते तर कोणी पण सांगेल नाथाभाऊ आणि सुरेशदादांसारखी… दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक… कधीकाळी सरपंच असणारे नाथाभाऊ आता मागील निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठीचे प्रमुख दावेदार होते. फडणवीसांनी खान्देशातीलच एका संकटमोचकाच्या माध्यमातून त्यांचा पत्ता कसा कट केला हि गोष्ट वेगळी. भाजपचे एकनिष्ठ (हो.. हो.. २३ ऑक्टोबर २०२० पर्यन्तच) नाथाभाऊंनी खान्देशात भाजपची पायामुळं मजबूत करण्यासाठी लोटगाडीवर स्पीकर फिरवून प्रचार केलाय.

याउलट होते आमचे सुरेशदादा जैन…. दादांनी इंदिरा काँग्रेस पासून सोशालिस्ट काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी परत शिवसेना असे अनेक पक्ष बदलले. पण एक मानावं लागेल दादांनी जळगाव शहरावरील आपले वर्चस्व कधी कमी होऊ दिले नाही. अनेकांनी दादांविरोधात अनेक प्रयत्न केले; पण दादा कायमच वरचढ राहिले. दादांनी सलग ७ वेळा वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीला उभं राहून आमदारकी जिंकलीये.

नाथाभाऊ आणि सुरेशदादा यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर कोणाची पकड मजबूत आहे यावरून सुरु झालेली वर्चस्वाची लढाई नंतर कट्टर शत्रुत्वात बदलली. अतिशय व्यक्तिगत स्थरावर गेलेल्या या लढाईत नेमकं कोण जिंकलं कोण हरलं हे त्या दोघांना देखील कळत नसेल. ते दोघे यातून काय गमावून बसलेत हे केवळ त्या दोघांनाच माहित. पण खान्देशाने पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद गमावले हे मात्र नक्की.

हे देखील वाचा : जळगावकरांना सुरेशदादांची आठवण पुन्हा येतेय; व्यक्तीप्रेम नव्हे शहराच्या विकासाशी आहे थेट संबंध…

मात्र एकेकाळी नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. हो अगदी खरं वाचताय… हे स्वतः एकनाथ खडसेंनी जाहीररीत्या सांगितलं आहे. १९९९ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात युती सरकारला मोठा धक्का बसला होता. सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडत होत्या. त्यात मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ होती ती वेगळीच.

शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा काढून काँग्रेस सोडत स्वतःचा वेगळा मार्ग निवडला होता. त्यामुळे त्यांचे पण एकत्र येणे कठीणच होते. राज्यात त्रिशंकू परिस्थिती होती. शिवसेना-भाजप युतीला १० आमदारांची गरज होती. पण हे आमदार फोडणार कोण? यासाठी हवा होता कोणी तरी पक्का खमक्या व्यापारी….

सुरेशदादा जैन. दादा तेव्हा शिवसेनेत होते. पक्ष सोडण्याचा त्यांचा दांडगा अनुभव होता. विशेष म्हणेज दादा पक्के व्यापारी कोणाची कोणती नस  दाबली कि काम होईल दादांना चांगलेच माहित होते. आता विषय अडकला फक्त मातोश्रीवर…. युती सरकारचे रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होते. साहेबांशी कोण बोलणार…

यावेळी नाथाभाऊंनी पुढाकार घेऊन साहेबांशी बोलण्याचे ठरवले.  भाऊंनी नितीन गडकरींना हि योजना समजावून सांगत त्यांना घेऊन मातोश्री गाठले. बाळासाहेबांना संपूर्ण योजना समजावून सांगत शिवसेनेचा मुखमंत्री कसा होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, साहेबांनी यासर्व गोष्टीला सरळ नकार दिला.

एकनाथराव खडसेंच्या सांगण्यानुसार, “राज्याची सत्ता व्यापारी प्रवृत्तीच्या हाती सोपवायची नाही.” अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली. यामुळे ठरलेला सर्व ‘प्लॅन’ रद्द करावा लागला. यात आता किती खरं किती खोट हे स्वतः सुरेशदादा किंवा नाथाभाऊंचं स्पष्ट करू शकतील.

लेख आवडल्यास शेअर करायला विसरू नका.

जनता कर्फ्यूला चाळीसगावकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे ; आ.मंगेश चव्हाण

0
support people janta curfew chalisgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । कोरोनाच्या दुस-या लाटेत चाळीसगाव तालुका आघाडीवर असून जिल्हाधिका-यांनी शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. दरम्यान, पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चाळीसगावकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तरच कोरोनाचा प्रार्दूभाव कमी होईल. असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे केले. शुक्रवारी येथील तहसिल कार्यालयात सकाळी ११.३० वाजता झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी खासदार उन्मेष पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डीवायएसपी कैलास गावडे, तहसिलदार अमोल मोरे, पोनि विजयकुमार ठाकुरवाड, नायब तहसिलदार विशाल सोनवणे उपस्थित होते.

कोरोनाच्या दुस-या लाटेत चाळीसगाव तालुका आघाडीवर असून जिल्हाधिका-यांनी गुरुवारी जनता कर्फ्यूबाबत दिलेले निर्देश लक्षात घेऊनच शुक्रवारी ही बैठक घेण्यात आली. बैठकीत शनिवारी व रविवारी जनता संचारबंदीत कडकडीत बंद पाळण्याबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व राजकीय पक्ष्यांसह सामाजिक संघटनांनी देखील यात सहभागी होऊन सहकार्य करावे. जनता संचारबंदी यस्वी झाल्यास लॉकडाऊनची समस्या उदभवणार नाही. असेही आमदार खासदार यांनी सागितले.

बैठकीला मुख्याधिकारी विकास नवाळे, उद्योजक वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, किराणा असोसिएशनचे जितेंद्र देशमुख, कापड असोसिएशनचे निलेश कटारीया, भाजीपाला असोसिएशनचे बापूसाहेब चौधरी, चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, मेडीकल असोसिएशनचे विनोद जैन, विजय गायकवाड, पोलिस गोपीनिय विभागाचे गणेश पाटील व व्यापारी, पत्रकार उपस्थित होते.

जळगावात घरातून २ लाख ७० हजार रूपयांची रोकड चोरीला ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । शहरातील गुजराथी गल्लीतील घरात अज्ञात चोरट्यानी २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आलीय. दरम्यान, याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिना दिशेन मल्लारा (वय-५८) रा. गुजराथी गल्ली, जुने बी.जे. मार्केट हे आपल्या मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. मुलगाचा व्यवसाय असल्यामुळे ते कामासाठी ११ मार्च रोजी सकाळीच निघुन गेले होते. तर सकाळी १० वाजता मिना मल्लारा आणि त्यांची सुन हे दोघे कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरात तीन मोलकरीण आणि नात घरात होते.

दुपारी काम आटोपून सुनेसह मिना मल्लारा घरी परतल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांनी घरातील कपाट उघडले असता त्यांना कपाटात ठेवलेले २ लाख ७० हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यांनी मुलगा आणि सुन यांना विचारणा केली असता त्यांनी आपण घेतले नसल्याचे सांगितले.

जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून हकीकत सांगितली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी मिना मल्लारा यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदिप पाटील करीत आहे.

पिस्टल हाताळताना गोळी सुटली ; खडक्यातील अल्पवयीन जखमी

0
a minor was injured while firing a pistol

भुसावळ तालुक्यातील खडका येथे तिघे मित्र एका जागेवर बसले असतानाच अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याची घटना गुरुवारी रात्री 10 ते 10.30 दरम्यान ही घटना घडली. 

हे प्रकरण वाढून आपल्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी मित्रांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेत खडका मिलजवळ तीन संशयीतांनी लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐवज न दिल्याने संशयीताने गोळीबार केल्याची माहिती तालुका पोलिसांना रात्री उशिरा दिली. 

या प्रकाराने पोलिस यंत्रणा पुरती हादरली व कामाला लागली. जखमीला तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले तर जखमी व त्याच्यासोबत असणार्‍यांनी दिलेल्या घटनास्थळावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकार्‍यांनी धाव घेत स्पॉट व्हेरीफिकेशन केले असता तेथे रक्ताचे डाग वा काही अप्रिय घडले नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला व जखमीसोबत असलेल्या मित्रांची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी लूट झाली नसल्याची कबुली देत घडल्या प्रकाराची कबुली दिली.

तालुका पोलिसांना लूट झाली नसताना पोलिसांना खोटी माहिती देवून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सुरज कोळी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. संशयीतांनी अल्पवयीनाकडून पिस्टल हातळतांना गोळी सुटल्याची कबुली दिली आहे. संशयीताने हे पिस्टल कुठून व कोणत्या उद्देशाने आणले? याचा खोलवर तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अल्पवयीन तरुणासह वरील चार संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत सांगितले.

पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अमोल पवार व कर्मचार्‍यांनी आरोपींना पकडन्यात कारवाई केली.   

भुसावळ शहर व तालुक्यात पोलिसांची दिशाभूल करून खोटा गुन्हा दाखल करणार्‍यांची यापुढे देखील गय केली जाणार नसल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले . मूळ घटना लपवून त्याला दुसर्‍या घटनेचे स्वरूप देण्याचा प्रकार तालुक्यातील खडका येथे उघड झाला असून पोलिसांना खोटी माहिती देणार्‍यांना आरोपी करण्यात आल्याचेही  वाघचौरे यांनी सांगितले.