जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ । राज्यात मागील काही दिवसापासून कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागला असून भुसावळ शहराच्या तापमानाने यंदा मार्चऐवजी फेब्रुवारी अखेरच चाळिशी गाठली आहे. ही स्थिती पाहता यंदाचा उन्हाळा शहरासाठी असह्य ठरू शकतो, असा अंदाज आहे.

गेल्या तीन दिवसांपासून भुसावळ शहराचे कमाल तापमान ४० अंशांवर असल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात झाली. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर होऊन दुपारी शहरातील रस्त्यांवर सामसूम दिसते. यंदा उन्हाळा देखील रेकॉर्डब्रेक ठरू शकतो, असा केंद्रीय जल आयोग कार्यालयाचा अंदाज आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तर शहरात ४६ अंश एवढ्या सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. साधारण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमान वाढून चाळिशी पर्यंत जाते. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाने चाळिशी गाठली आहे. तत्पूर्वी, २२ फेब्रुवारीपासून शहराच्या तापमानात बदल झाला. २२ फेब्रुवारीला किमान तापमान १४.५ अंश होते. २३ पासून यात सरासरी दोन अंशांची वाढ झाली. कमाल तापमानही दोन अंशांनी वाढचले. २२ फेब्रुवारीला कमाल तापमान ३८.७, तर २४ला त्याने चाळिशी गाठल्याची नोंद केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात झाली. ही स्थिती पाहता यंदाचा उन्हाळा शहरासाठी असह्य ठरू शकतो, असा अंदाज आहे.
किमान तापमान ६ अंशांनी वाढणार भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राच्या अंदाजानुसार येत्या २ मार्चपर्यंत जिल्ह्याचे कमाल तापमान सरासरी ३६ ते ३७ अंशांपर्यंत राहील. मात्र, शनिवारी १२ अंश असलेले किमान तापमान पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने वाढून १८ अंशांपर्यंत पोहोचेल. या कालावधीत वाऱ्याचा वेग सरासरी ८ ते ११ किमी प्रतिसाद असेल. ८ मार्चपर्यंत हवामान कोरडे राहील.
किमान तापमान ६ अंशांनी वाढणार भारतीय हवामान खात्याच्या मुंबई प्रादेशिक केंद्राच्या अंदाजानुसार येत्या २ मार्चपर्यंत जिल्ह्याचे कमाल तापमान सरासरी ३६ ते ३७ अंशांपर्यंत राहील. मात्र, शनिवारी १२ अंश असलेले किमान तापमान पाच दिवसांत टप्प्याटप्प्याने वाढून १८ अंशांपर्यंत पोहोचेल. या कालावधीत वाऱ्याचा वेग सरासरी ८ ते ११ किमी प्रतिसाद असेल. ८ मार्चपर्यंत हवामान कोरडे राहील.
हे देखील वाचा :
- महागाईचा आणखी एक झटका! महाराष्ट्रात दूध ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?
- जळगाव जिल्ह्याला आज पुन्हा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
- जळगाव बायपासवरील काम युद्धपातळीवर; १५ ऑगस्टपासून एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला
- ‘एक पेड़ पापा के नाम’! जळगावात वडिलांच्या स्मृतींना वृक्षारोपणातून मानवंदना
- बैलजोड्या चोरीप्रकरणी तिघांना अटक; ७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त










