⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

अखेर महाराष्ट्र सरकारने अहमदनगर शहराचे नाव बदलले ; आता ‘या’ नावाने ओळखले जाईल?

जळगाव लाईव्ह न्यूज । 13 मार्च 2024 । अहमदनगरचं नामांतर करावं अशी मागणी लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी गेल्या अनेक दिवसांपासून केली होती. अखेर राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अहमदनगर शहराचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सरकारने याआधी औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं आहे. त्यानंतर आज अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं देखील नामांतर करण्यात आलं आहे. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत.

वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आलाय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.