⁠ 
बुधवार, मे 1, 2024

धक्कादायक : महिलेवर करण्यात आले चाकूने वार ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । शहरात महिला एका तरुणासोबत लिव्ह इन रिलेशीपमध्ये राहत होती. त्या नंतर हि महिला आपल्या आई सोबत निघून गेली. त्या रागातून ३० वर्षीय महिलावर तरुणाने चाकूने वार केल्याची गंभीर घटना जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे घडली आहे . या घटनेत महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी गुरुवार, १९ मे रोजी गुन्हा दाखल होवून रामानंदनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

जळगाव शहरातील गेंदालाल मील भागातील ३० वर्षीय महिला रामानंदनगर परिसरातील बंटी उर्फ प्रदुम्न नंदू महाले यांच्यासोबत लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. महिला बंटी यास सोडून तिच्या आईकडे राहायला गेल्याच्या रागातून बंटी याने १८ मे रोजी आशाबाबनगर येथे महिलेच्या हातावर व डोक्यावर चाकूने वार केले. तसेच चाकूने दहशत निर्माण केली. तर बंटी सोबतच्या इतर तिघांनी तक्रार करु नये म्हणून महिलेला रिक्षातून पळवून नेले.

महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवार, १९ मे रोजी बंटी ऊर्फ प्रदुन्म नंदू महाले( रा. रामानंदनगर), अरबाज अमजद खान पठाण (रा.आझाद नगर), गुलशन रजा (रा.चिश्तीया मशीदजवळ ), समाधान हरचंद भाई (रा. खंडेराव नगर) व सोनू ऊर्फ समीर शेख लुकमान शेख (रा.पिंप्राळा हुडको) या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शांताराम पाटील हे करीत आहेत.