जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १०५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) लागू करण्यात आले आहे.
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तू घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. प्रेतयात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही, असे अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवले आहे.
हे देखील वाचा :
- एरंडोलजवळ चार वाहनांच्या विचित्र अपघातात पाचोऱ्याचा तरुण ठार
- समता भातृ मंडळ पिंपरी-चिंचवड आयोजीत लेवा पाटीदार समाजाचा स्नेहमेळावा साजरा
- भुसावळ वाणिज्य विभागाने एप्रिलमध्ये कमविले ‘तब्बल’ इतके कोटी; एकदा आकडा वाचा
- शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना शंका! विधानसभेत भाजप मदत करेल का? गुलाबराव पाटीलांकडून संभ्रम दूर, म्हणाले..
- विहिरीतून कबुतर पकडणे दोन मुलांच्या जीवावर बेतले ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना