जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे शॉट सर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले.
या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बुद्रूक, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या भावाच्या नावे वाघळुद बु. शिवारातील वाघळूद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे.
या शेतात त्यांनी ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मोती पवार करत आहेत.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
- जामनेर तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले
- जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने केळीचा भाव क्विंटल मागे ‘इतक्या’ रुपयांनी वाढला ; शेतकऱ्यांना दिलासा
- Jalgaon : खरीप हंगामासाठी पीकनिहाय कर्जदर निश्चित, केळी-कापूससाठी मिळणार इतके रुपये..
- भाव मिळत नसल्याने मुक्ताईनगरातील शेतकऱ्याने केळी बाग उपटून फेकली