जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे शॉट सर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले.

या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बुद्रूक, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या भावाच्या नावे वाघळुद बु. शिवारातील वाघळूद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे.
या शेतात त्यांनी ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मोती पवार करत आहेत.

हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






