जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । चोरट्यांचा धुमाकूळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसेन दिसव वाढत आहे. जामनेर येथील शास्री नगरमधील चार शेतकऱ्यांची गुरे महागड्या कारमधून चोरट्यांनी चाेरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, चोरटे सीसीटिव्ही मध्ये चित्रित झाले आहे. या घटनेतील चाेरट्यांना शाेधून त्यांचा पाेलिसांनी कायमचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह पशूधारकांकडून केली जात आहे.
जामनेर शहरातील शास्त्रीनगर भागातून २४ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वासरासह पाच गायींची चोरी केली. विशेष म्हणजे या चोरट्यांनी चक्क एका कारमध्ये गुरांना कोंबून नेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमुळे उघड झाले आहे. यामुळे पशूधन बाळगणाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणी शास्त्री नगरमधील भूपेश भरत गायकवाड, शिवाजी समाधान भोलाणे, विकास काशीनाथ महाजन, अक्षय वाघ या चौघांची एकूण ५ गुरे चोरी झाल्याची तक्रार जामनेर पोलिसांत देण्यात आली आहे. चोरी झालेल्या गुरांची जवळपास ४० हजारावर किंमत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, थंडीचा कडाका वाढल्याने नागरिक लवकरच घर लावून घरातच राहणे पसंत करतात. त्याचा लाभ उठवत चोरट्यांनी चाेरी केल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले. पोलिसांनी मध्यरात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
- टँकरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार तरुण ठार, आई गंभीर जखमी
- दारूसाठी मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या; जामनेर तालुक्यातील घटना
- यावल येथील एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता ; परिसरात खळबळ
- लाच भोवली ! ग्रामसेवकासह शिपाई जळगाव लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
- सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जामनेरच्या सीआरपीएफ जवानाची आत्महत्या