जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । टाकरखेडा ( ता.यावल ) येथील शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या भुरट्या चोरट्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यावल पोलिसांना निवेदन दिले.

रविवारी येथील पोलिस ठाण्यात टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यात गेल्या काही दिवसांपासून शेत शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटना होत आहेत. नुकतेच अनेकांच्या शेतातून स्प्रिंकलर, केबल आणी इतर शेती साहित्य चोरी गेले. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी विजय चौधरी, रामचंद्र चौधरी, समाधान चौधरी, विलास चौधरी यांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्याकडे केली.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी ‘फॉर्मर आयडी’ अनिवार्य
- डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पर्यावरण दिनानिमित्त ३५१ रोपट्यांचे रोपण
- जळगावात ‘प्रधानमंत्री नॅशनल ॲप्रेंटिसशिप’ भरती मेळाव्याचे आयोजन; नोंदणी कशी आणि कुठे कराल
- Rain Alert : आज राज्यातील २३ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला ; जळगावात कशी राहणार स्थिती?
- रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी रक्षा खडसेंची रेल्वे बोर्डाच्या चेअरमनाकडे मागणी