जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । टाकरखेडा ( ता.यावल ) येथील शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या भुरट्या चोरट्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यावल पोलिसांना निवेदन दिले.
रविवारी येथील पोलिस ठाण्यात टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यात गेल्या काही दिवसांपासून शेत शिवारातून शेती साहित्य चोरीच्या घटना होत आहेत. नुकतेच अनेकांच्या शेतातून स्प्रिंकलर, केबल आणी इतर शेती साहित्य चोरी गेले. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी विजय चौधरी, रामचंद्र चौधरी, समाधान चौधरी, विलास चौधरी यांनी पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्याकडे केली.
हे देखील वाचा :
- महिला आयोगाच्या जनसुनावणीत 94 प्रकरण दाखल ; तीन पॅनल कडून कार्यवाही
- एकनाथ खडसेंकडे बघायची स्थिती राहिलेली नाही; आ.चंद्रकांत पाटीलांची टीका काय?
- डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र स्थापन
- तरसोद येथील शेकडो युवकांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
- रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली; कोण काय म्हणालं वाचा..