जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । अतिवृष्टीचे जास्तीचे आलेले ५० हजार रुपयांचे अनुदान, जवखेडेसिम (ता.एरंडोल) येथील शेतकऱ्याने २९ रोजी प्रामाणिकपणे प्रशासनाला परत केले. शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतूक होत आहे. गोरखनाथ माधवराव भदाणे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान बँक खात्यांद्वारे वितरीत केले जात आहे. जवखेडेसिम (ता.एरंडोल) येथील शेतकरी गोरखनाथ माधवराव भदाणे यांच्या, जिल्हा बँकेच्या निपाणे शाखेतील खात्यावर एक महिन्यापूर्वी ५० हजारांची रक्कम चुकून जमा करण्यात आली होती. गोरखनाथ भदाणे यांनी एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, ताडे येथील तलाठी मुंडे व जवखेडेसिमचे सरपंच दिनेश पाटील (आमले) यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाकडून झालेली चूक लक्षात आणून दिली. तसेच शेतकरी गोरखनाथ भदाणे व त्यांचा मुलगा बी.एस.एफ. जवान विजयकुमार भदाणे यांनी, ही रक्कम प्रशासनाला परत करण्याचा निर्णय घेतला. २८ डिसेंबरला बँक खात्यात जमा झालेली रक्कम पिता-पुत्राने काढून बुधवारी प्रशासनाला परत केली.
त्यामुळे प्रशासनाकडून एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी गोरखनाथ भदाणे यांचा तहसील कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शासनाकडून चुकून आलेली रक्कम परत केल्याबद्दल गोरखनाथ भदाणे यांचे गावात व परिसरात कौतूक होत आहे.
हे देखील वाचा :
- पुस्तक परीक्षण: स्टार्टअप रोडमॅप : यशस्वी उद्योजकतेचा मार्ग
- अखेर तापी मेगारिचार्ज प्रकल्पाला मध्यप्रदेश सरकारकडून मंजुरी; जळगावातील ‘हे’ तालुके सुजलाम् सुफलाम् होणार?
- सोनिया गांधींच्या राष्ट्रपतींवरील टिप्पणीने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या !
- उद्यापासून अट्रावल येथील मुंजोबा यात्रेला सुरुवात; असे आहेत यात्रेचे वार
- PF अकाउंटमध्ये आतापर्यंत किती पैसे जमा झाले? घरीबसून अशा पद्धतीने चेक करा बॅलेंस..