⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

४५ वर्षीय महिलेचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज १२ जून २०२२ । जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील एका गावात ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतातील काम करून आपला उदरनिर्वाह करते. दरम्यान, ११ जून रोजी महिला आपल्या घरी असतांना गवातील दिपक रविंद्र हिवरे, मंगल रविंद्र हिवरे आणि सोनी रविंद्र हिवरे या तिघांना मागील भांडणाचे कारणावरून महिलेशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करून अंगावरील साडी ओढून अश्लिल शिवीगाळ करून विभयभंग केला. व शिवगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई करत आहे.