जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक आज पार पडणार असुन चुरशीची लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.
एक सदस्य मयत झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यापुर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक २ मध्ये ओबीसी जागेवर शिवसेना कार्यकर्ते अजाबराव पाटील निवडुन आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पाटील यांचे निधन झाल्यामुळे हि जागा रिक्त झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये होणारी हि पोटनिवडणूक ओबीसी आरक्षण वादामुळे स्थगित होऊन जनरल करण्यात आल्याने पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. या एका जागेसाठी दोन उमेदवार प्रतिस्पर्धी रिंगणात असुन काट्याची लढत रंगणार असल्याची चर्चा असुन नितीन नाना पाटील व विजेंद्र काशिनाथ कोळी या दोन उमेदवारात लढत होणार आहे. रविवारी प्रचार संपला. १८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असुन १९ रोजी मतमोजणी होऊन निकाल समजणार आहे. यापुर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाॅर्ड क्र २ मध्ये या दोंन्ही उमेदवारांना हार पत्करावी लागली होती.
हे देखील वाचा :
- जळगावकरांनो काळजी घ्या! 21 मे पर्यंत तापमानाचा पारा 44 अंशावर राहणार, IMD चा अंदाज
- जळगाव रेल्वेस्थानकाच्या कचरा पेटीत सापडलेल्या अनाथ मुलीची MPSC परीक्षेत बाजी
- ऑनलाईन पेक्षा स्वस्त आयफोन जळगावात; iPhone 13 मिळवा फक्त ४० हजार रुपयात
- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस उत्साहात संपन्न
- प्रवाशांना दिलासा ! ओखा-मदुरै एक्स्प्रेस २८ जूनपर्यंत धावणार ; भुसावळ, जळगावला आहेत थांबा