पोस्टाची लयभारी योजना! दररोज फक्त 50 रुपयाची बचत करा अन् 35 लाख रुपये मिळवा

जून 24, 2022 3:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी आहे. पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना असे या योजनेचे नाव असून जर तुम्ही ग्राम सुरक्षा योजनेसाठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवले तर तुम्ही स्वतःसाठी 35 लाख रुपयांचा परतावा सुनिश्चित करू शकता. म्हणजेच या योजनेत महिन्याला १५०० रुपये जमा केल्यास ३५ लाख रुपये मिळू शकतात. पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचा एक भाग आहे. ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी 1995 मध्ये भारतातील ग्रामीण जनतेसाठी सुरू करण्यात आली.

post office

ग्राम सुरक्षा योजना म्हणजे काय?
ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्याला पूर्ण 35 लाखांचा लाभ मिळतो. गुंतवणूकदाराला या योजनेची ही रक्कम 80 व्या वर्षी बोनससह मिळते. यामध्ये, या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचा वयाच्या 80 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास, त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळते.

19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणीही गुंतवणूक करू शकतो
19 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये किमान 10,000 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. यामध्ये प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्यायही दिले आहेत. गुंतवणूकदार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर हप्ता भरू शकतो.

चार वर्षांनी कर्ज मिळते
ग्राम सुरक्षा पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही कर्जाचा लाभही घेऊ शकता. तथापि, पॉलिसी खरेदी केल्यानंतर 4 वर्षांनीच कर्ज घेता येते. याशिवाय, पॉलिसीच्या मुदतीदरम्यान कोणत्याही वेळी प्रीमियम भरण्यात डिफॉल्ट असल्यास, तुम्ही प्रलंबित प्रीमियम रक्कम भरून ते पुन्हा सुरू करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories