⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | दुर्दैवी : बाप्पाला निरोप देण्याच्या दिवशी सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

दुर्दैवी : बाप्पाला निरोप देण्याच्या दिवशी सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी समोर आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे अनंत चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे नदीवर विसर्जन सुरू होते. दरम्यान, याच वेळी तितूर नदीत कमळेश्वर के.टी. वेअरजवळ साहिल शरीफ शहा (वय-१०) व आयान शरीफ शहा (वय-१४) दोघेही रा.वाघळी हे पोहायला गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते वाहू लागले. बाहेर पडता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान यातील एका मुलाचा मृतदेह तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर मिळून आला आहे. तर एकाचा शोध अद्याप सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.