जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील गंगापुरी ते गारखेडेदरम्यान भीषण अपघात झाला. यात भुसावळहून जामनेरकडे येणाऱ्या प्रवासी रिक्षाला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ जण ठार झाले. तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये सरला गोपाळ निंबाळकर (वय ४२) आणि त्यांची मुलगी निकिता गोपाळ निंबाळकर (२०, दोन्ही रा. चिंचखेडे बुद्रूक, ता. जामनेर) आणि प्रमोद श्रीराम गुरुभैया (३२, रा. तळेगाव, ता. जामनेर) यांचा समावेश आहे. यातील निकिता हीच तीन महिन्यावर लग्न आले होते.

मिक्सर ट्रक क्रमांक एम एच 19 सी एक्स 2181 या गाडीने पियाजो रिक्षा क्रमांक एम एच 19 व्ही 3704 ला जबरदस्त धडक दिली. रिक्षात एकूण आठ प्रवासी बसलेले होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर जयेश निंबाळकर (वय (४५, १६), योगेश गायकवाड रिक्षाचालक, रा. विवेकानंद नगर, जामनेर), सुरेखा विलास कापडे (५०) संगीता सुभाष चौधरी (५०, दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर), अखिलेश कुमार (५०, रा. उत्तर प्रदेश) हे जखमी झाले आहे. धडक बसताच रिक्षा पूर्णपणे गोल फिरून रस्त्याच्या बाजूला उलटली.











