जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२५ । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमी येथे आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून अनुयायी येतात. या दरम्यान पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर आणि अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्यांना जळगाव, भुसावळ चाळीसगाव थांबा असणार आहे.

नागपूर ते मुंबई एकेरी गाड्या
गाडी क्र. ०१२६० ही रेल्वे ४ डिसेंबर रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ०१२६२ ही रेल्वे ४ रोजी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.०५ वाजता पोहोचेल. क्र. ०१२६४ गाडी ५ रोजी नागपूर येथून ८.०० वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२६६ ही गाडी ५ रोजी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथे थांबे असतील.

मुंबई ते नागपूर एकेरी गाड्या
क्र. ०१२४९ ही गाडी ६ रोजी मुंबई येथून २०.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल. क्र. ०१२५३ ही गाडी ७ रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.
क्र. ०१२५१ ही गाडी ७ रोजी मुंबई येथून १०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल. क्र. ०१२५५ ही गाडी ७ रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२५७ दि. ८ रोजी मुंबई येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाड्यांना चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर येथे थांबे असतील.
अमरावती- मुंबई अनारक्षित विशेष गाड्या
क्र. ०१२१८ ५ रोजी अमरावती येथून १७.४५ वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०५.४५ वाजता पोहोचेल. तसेच क्र. ०१२१७ ही गाडी ७ रोजी मुंबई येथून ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. या गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे असतील.







