जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । भडगाव तालुक्यातील वाडे बांबरूड शिवारातील शेतात असलेल्या शेळ्यांच्या वाड्यावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यात शेळीची ६ पिले ठार, तर एक गंभीर जखमी झाले. यामुळे शेळी मालकाचे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील वाडे बांबरूड प्र.ब.शिवारात सुरतसिंग सरदारसिंग परदेशी यांच्या शेतात शनिवारी सकाळी मोसंबी, लिंबू बाग व झोपडीत शेळीचे मृत पिले आढळून आली. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला. या शेतशिवारात लांडग्यांसह वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. परदेशी यांचे हे शेत कजगाव वाडे रस्त्यानजीक व गिरणा जामदा डाव्या कालव्याला लागून आहे.
या शेतात हे विनोद भिल्ल यांचा परिवार राहतो. शेळीपालन व मोलमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. आता शेळ्याच ठार झाल्याने या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. पशुपालक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वनविभागाने तात्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
हे देखील वाचा :
- …तर उद्धव ठाकरेंना 15 आमदार तरी निवडून आणता आले असते का? गिरीश महाजनांचा सवाल
- सीआयएससीई बोर्डच्या 10वीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश
- केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच.. शेतकरी संकटात
- मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारली ; मंत्री गुलाबराव पाटील संतापले, म्हणाले कोणी माईचा लाल..
- दुष्काळात तेरावा महिना! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ.. नवीन दर पहा