जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । यावल शहरातील विरार नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून १५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
विरार नगरातील रहिवासी तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पुष्पा विजय अहिरराव या ९ फेब्रुवारीपासून घराला कुलूप लावून मध्य प्रदेशातील इंदूर येथे नातवाइकांकडे लग्नाला गेल्या होत्या. दहा दिवसांनी शनिवारी ‘त्या’ घरी परतल्या. यावेळी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यांनी कपाटात ठेवलेले १५ हजार रूपये शोधले असता ते मिळून आले नाही. याबाबत यावल पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला. तपास उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करत आहे.
- धक्कादायक ! झोळीत झोपलेल्या ८ महिन्यांच्या चिमुकल्याला चोरले..
- भयंकर ! दुचाकी घसरल्याने माय-लेकाला मागून येणाऱ्या टँकरने चिरडले
- भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
- रात्री लग्न, पहाटे दागिने घेऊन नववधू पसार ; जळगावात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
- Jalgaon : ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा झाला उलगडा, खुनी पोलिसांच्या जाळ्यात