जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील नागरिकांना रेशनकार्ड संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने गेल्या जुलै २०२१ पासून प्रयत्न सुरू होते. गावातील सुमारे १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशनकार्ड बनवून देण्यात राष्ट्रवादी पार्टीला यश आले आहे. तसेच ९५०५ लोकांना १२ अंकी ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून ४७२५० किलो धान्य मंजूर करण्यात आले. कुटुंबांचे नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वाढविण्यात व कमी करण्यात पार्टीच्या कार्यकर्त्यांना यश आले.

वर्षानुवर्षांपासून वरील समस्या लोकांना भेडसावत होत्या. समस्या सोडविताना वैयक्तिक नागरिक अनेक अडचणींना तोंड देत होते. त्यावर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत होती. पैसे घेऊनही काम होत नव्हती या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने तहसीलदार जळगाव यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिना पर्यंतची मुदत देण्यात आली. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी नशिराबाद ते जळगाव तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत जात दांडी मार्च आंदोलन करण्यात आले. नागरिकांची ही कागदपत्रे जमा करून शासकीय शुल्क स्वीकारत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. सर्व प्रयत्न फळास लागून समस्या नागरिकांच्या आयुष्यात अमुलाग्र व सकारात्मक बदल घडविणारे हे कार्य तातडीने केले. फेब्रुवारी महिन्यापासून नशिराबाद नागरिकांना याचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे.

रेशन कार्ड व 12 अंकी क्रमांक वाटप कार्यक्रमास महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथ खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 18 फेब्रुवारी रोजी ७:०० वाजता होळी मैदान खालची आळी येथे संपन्न होणार आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्ह्याची पाण्याची चिंता संपणार? गिरणा धरण शंभरीच्या उंबरठ्यावर!
- पुणे यार्डातील तांत्रिक कामामुळे भुसावळ, जळगावमार्गे धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या सेवेत मोठा बदल
- पावसाचा हायअलर्ट ! जळगावसह अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
- जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट’; हवामान खात्याचा इशारा
- रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ‘योगपर्व २०२६’ स्थापना समारंभ







