---Advertisement---
जळगाव जिल्हा

तुर्कीवरून आयात होणार खसखस महागला, पण सुकामेव्याचे भाव स्थिर, पहा काय आहेत भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२५ । ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सध्या दोन्ही देशातील युद्ध शांत झाले असून परंतु पाकिस्तानला तुकीं देशाने मदत केल्याने भारताने तुकींच्या अनेक गोष्टींवर प्रतिबंध लावले आहे. यामुळे तुर्कीवरून आयात होणारी खसखसच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

sukhameva

मात्र जळगावातील सुकामेव्याचे भाव युद्धाच्या आधी व युद्धविराम नंतरदेखील स्थिर आहे. अवघ्या काही दिवसांतच युद्ध थांबल्याने बाजारपेठेवर याचा परिणाम झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खसखसच्या दरात सुमारे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान व अरब देशातून येणारा सुका मेव्याचे भाव स्थिर आहे.

---Advertisement---

सुकामेवा भाव काय सांगतात?
काजू : आजचे दर १०००…… मागील महिन्यात २५० ते १०००
बदाम : आजचे दर ९००…… मागील महिन्यात ९००
अंजिर : आजचे दर १२००…… मागील महिन्यात १२००
मनुका : आजचे दर ४००…… मागील महिन्यात ४००
जरदाळू : आजचे दर ८५०…… मागील महिन्यात ७५०
अक्रोड : आजचे दर ७५० …… मागील महिन्यात ७५०
खसखस : आजचे दर १५५०…… मागील महिन्यात १३५०
खारीक : आजचे दर ४००…… मागील महिन्यात ४००

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment