जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यात पीएम किसान सन्मान योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकाराचा संशय आहे. या प्रकरणी शासकीय व अशासकीय संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे, की स्वतःच्या नावावर एक गुंठा ही शेतजमीन नसलेले पाच सहा हजार जणांना शेतकरी दाखवून तालुक्यात त्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या प्रकरणी किती अचूक बोगस शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ते कोणाच्या लॉगीन वरून करण्यात आले आहे. ज्या लॉगिन वरून हे करण्यात आले आहे. तसेच या बोगस प्रकरणांना मंजुरी देणारे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केली असल्यास काय व कोणावर कारवाई करण्यात आली आहे. याची माहिती मिळावी तसेच या प्रकरणी रक्कम वर्ग झाली आहे. ती परत मिळविण्यासाठी काही कार्यवाही करण्यात आली आहे. का? याची देखील माहिती देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
हे देखील वाचा :
- Parola : टोल नाक्यावर दोन गटांमध्ये भीषण हाणामारी, 8 जण जखमी
- लाच भोवली ! ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या एसीबीने सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या
- पारोळ्याच्या दोन माजी नगराध्यक्षांसह तिघांना १० वर्षांची शिक्षा ; नेमकं प्रकरण काय?
- पारोळ्यात तंबाखू, सुपारीने भरलेला कंटेनर पकडला ; ६० लाखांचा मुद्देमाल जप्त..
- Parola : माहेरी गेलेल्या पत्नीला भेटला, घरी पायी जायला निघाला अन् तरुणासोबत घडलं विपरीत