जळगाव लाईव्ह न्युज | २५ मे २०२२ | वाकोद शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या कामास जोमाने लागले असून सर्वत्र शेत नांगरणीची कामे सुरू आहेत. परंतु घसरलेल्या कांद्याच्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे खरीप पिकांसाठी आर्थिक नियोजन कसे कराववे, या चिंतेत शेतकरी सापडले अाहेत. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. वाकोद येथील राजू शिरसाठ यांनी कांदा लागवड केली हाेती.
त्यांना जवळपास ५० क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले. परंतु, कांद्याचे भाव घसरल्यामुळे कांदा घेण्यासाठी कुणी तयार होईना. तर वाढत्या उष्णतेमुळे खराब व सडलेला निम्मे कांदा त्यांना फेकावा लागला. हा कांदा लागवडीसाठी त्यांना जवळपास ६० हजार रूपये खर्च आला हाेता. परंतु, आतापर्यंत एक रुपयाही उत्पन्न हातात आलेले नाही. तर हा खर्च भागवताना शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आगामी खरिपाचे नियोजन कसे करावे, ही समस्या अाता शेतकऱ्यांपुढे उभी राहिली आहे.
सध्या कांदा हाच एकमेव आर्थिक स्रोत देणारा घटक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित प्रति क्विंटल तीन हजार रुपये बाजारभाव द्यावा, अशी मागणी हाेत असली तरी सध्या व्यापारी हजार रूपये क्विंटलने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करुन नेण्यासाठी तयार नाहीत.
चोपडा राज्यासह देशात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार समिती व नाफेडतर्फे उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत अाहे. यात पार्श्वभूमीवर सर्वच लाेकप्रतिनिधींचे कांदा-प्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लाेकप्रतिनिधींच्या सोशल मीडियावरील व्हिडिओज आणि मेसेजेसजच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन ‘शेतकऱ्यांच्या कांद्याला तत्काळ ३० रुपये प्रति किलोचा भाव द्यावा’, अशी मागणी करावी. ही मागणी करताना मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेत कमेंट्स कराव्यात, असे रघुनाथ-दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी आवाहन केले आहे. कांद्याचे दर प्रचंड घसरल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या अाहेत. तर काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. कांदा दर घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असताना राज्य व देशातील लाेकप्रतिनिधींचे मात्र कांदा प्रश्नावरती सोयिस्कररित्या दुर्लक्ष होत आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांच्याच सोशल
मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या घसरलेल्या बाजार भावात तात्काळ सुधारणा व्हावी व कांद्याला कमीत कमी ३० रुपये किलोचा दर मिळावा. कांद्याची अधिकाधिक निर्यात करावी, यासाठी हजारो कमेंट्सच्या माध्यमातून आवाज उठवावा. केलेल्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट काढून शेतकऱ्यांनी आपापल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करावेत. कांद्याचे दर वाढण्यासाठी रास्ता रोको, मोर्चे यासारखे आंदोलने तर सुरूच राहतील. परंतु आता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात राजकीय नेत्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टला शेतकऱ्यांनी कमेंट्स देवून संबंधित नेत्यांचे कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधून घ्यावे.
नशिराबाद ग्रामदैवत झिपरू अण्णा महाराज यांच्या ७३ व्या पुण्यतिथी सोहळ्याची मंगळवारी श्रींच्या पादुका पालखी मिरवणुकीने सागंता होत आहे. मंगळवारी सकाळी श्रींना अभिषेक, पूजन होईल. सकाळी ७ वाजता श्रींच्या समाधि मंदिरापासून पालखी मिरवणुकीस प्रारंभ त्यानंतर काल्याचे कीर्तन हाेईल.