जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथे शॉट सर्किटमुळे आग लागून ९ बिघा शेतातील ऊस जळून शेतकऱ्याचे तब्बल ७ लाख ४० हजाराचे नुकसान झाले.

या संदर्भात गोकुळ पाटील (वय ४८ रा. वाघळुद बुद्रूक, ता. धरणगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या भावाच्या नावे वाघळुद बु. शिवारातील वाघळूद-बोरखेडा शिव रस्त्यालगत शेत गट नं. ६९/३,६९/४,६९/५ मध्ये ९ बिघे शेत आहे.
या शेतात त्यांनी ऊस लावलेला होता. २ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ईलेक्ट्रीक शॉर्ट सर्किट होऊन आगीत ऊस जळून खाक झाला. यात अंदाजे ७ लाख ४० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस कर्मचारी मोती पवार करत आहेत.
हे देखील वाचा :
- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ”स्वच्छता पुरस्कार 2025” उपक्रम
- गिरीश महाजनांचे ‘जलसंपदा’ फेल, गुलाबराव पाटीलांचे ‘पाणीपुरवठा’ विभाग राज्यात पहिले
- 3 जूनपर्यंत जळगाव जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी लागू
- आनंदाची बातमी! जळगावमार्गे धावणार उधना-गया विशेष ट्रेन
- महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झोडपणार; 25 जिल्ह्यांना अलर्ट