निवडणुका कधीही लागू द्या, आम्ही तयार आहोत ; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

जुलै 29, 2022 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले असून एक महिना उलटला तरी देखील या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही झालेला नाही. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. सरकार पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही, असे सांगत निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत, असे पवार यांनी यावेळी म्हटले.

sharad pawar 1 jpg webp

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जवळपास एक महिना झाला राज्याला मंत्री नाही. राज्यात पूरपरिस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ असणं आवश्यक आहे. लोक संकटात आहेत. विरोधी पक्ष नेते तिकडे भेटी देताय यातून मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यावा. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळही (chhagan bhujbal) उपस्थित होते.

न्यायलयाने obc आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. यामुळे मोठा वर्ग नाराज होईल,हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती याने निर्माण झाली आहे. जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले टेंडर निघाले त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू, आगोदर obc बाबत निर्णय होऊ द्या, असे पवार म्हणाले.

आमच्या घटक पक्षानी एकत्र निवडणूक लढवावी, अशी तरी सद्या आमची भूमिका आहे. आपल संघटन खीळखीळ झालंय का यावर बोलताना पवार म्हणाले, ज्या वेळेस निवडणुका लागतील तेंव्हा जनता कौल देईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now