जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२५ । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुरुवारी जालना पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोन आरोपींना अडीच कोटींची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. या सर्व घटनाक्रमानंतर आज शुक्रवारी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक मनोज जरांगे पाटील यांनी केला असून यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे ?
जरांगे यांच्या हत्येचा कटासाठी अडीच कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ऑफर देण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांनी हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव घेतलं आहे. ही व्यक्त धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता किंवा पीए असल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. याच कांचन नावाच्या व्यक्तीने दोन्ही आरोपींना हाताशी धरून आपल्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती दिली.

आपल्याला मारण्यासाठी तीन प्रकारची योजना आखण्यात आली होती. यात बीडचा एक कार्यकर्ता किंवा पीए… हा पीए दोनपैकी एका आरोपीकडे गेला होता. तिथून याची सुरुवात झाली. पहिलं काम ठरलं होतं… खोट्या रेकॉर्डिंग बनवा, व्हिडीओ बनवा, ते द्या. पण त्यांना खरे आणि खोटे कसलेच व्हिडीओ मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी खूनच करून टाकायचा प्लॅन केला. मग गोळ्या देऊ… औषध देऊ… असा मारायचं याचा प्लॅन केला. गाडीने गाडी धडकून मारू, असा प्लॅन झाला. त्यासाठी परराज्यातील पासिंग असलेली गाडी देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली, असेही जरांगे यांनी सांगितले.












