⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेंतर्गत मिळेल दरमहा ‘इतके’ रुपये ; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । राज्य शासनाने महाराष्ट्र विधवा पेंशन योजना सुरू केली असून राज्यातील सर्व विधवा महिलांना विधवा पेन्शन योजनेतून आर्थिक मदत करण्यासाठी राज्य शासनाकडून त्यांना आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नाही. अशा महिलांच्या मदतीसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेशी संबंधित सर्व माहिती आज आम्ही सांगणार आहोत. या योजनेची नोंदणी कशी करावी आणि पात्रता काय असणार आहे याबाबतही तुम्हाला माहिती देणार आहोत. Maharashtra Widow Pension Scheme

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2022 काय आहे?
विधवा महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांना जीवनात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाची योजना आहे. आर्थिकदृष्ट्या निराधार आणि असहाय असलेल्या राज्यातील सर्व विधवा महिलांना महाराष्ट्र विधा पेन्शन योजना 2022 चा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असतील तर तिला या योजनेद्वारे 900 रुपयांची आर्थिक रक्कम दिली जाईल. आणि तिची मुले 25 वर्षांची होईपर्यंत तिला हा लाभ मिळेल. जर विधवा महिलेला मुलगा नसेल आणि तिला फक्त मुलगी असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळत राहील. महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेने अर्ज करावा.

महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभ
महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ राज्यातील आर्थिकदृष्ट्या असहाय व निराधार असलेल्या सर्व महिलांना देण्यात येणार आहे.
या योजनेच्या मदतीने, एक विधवा महिला सहजपणे तिच्या मुलांचे संगोपन करू शकतात.
राज्यातील सर्व विधवा स्त्रिया कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय त्यांचे जीवन सहज जगू शकतात.
जीवनातील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
सरकारने दिलेली पेन्शनची आर्थिक रक्कम लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात थेट पाठवण्यात येईल.
या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 600 रुपये दिले जातील.
महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2022 द्वारे, एखाद्या विधवा महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास, त्यांना योजनेअंतर्गत दरमहा 900 रुपये आर्थिक रक्कम दिली जाईल.
या पेन्शन योजनेद्वारे विधवा महिला आपले कुटुंब सांभाळू शकतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात.

महाराष्ट्र विधवा निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्रता –
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असावा.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 पेक्ष्या जास्त नसावे.
अर्जदाराचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असणे गर्जेचे आहे.
दारिद्र्यरेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा व कुठे करावा?
सर्वप्रथम, लाभार्थी महिलांनी https://jalgaon.gov.in/sanjay-gandhi-yojana/ अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल.
होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मचा पर्याय दिसेल.
महाराष्ट्र-विधवा-पेन्शन-योजना
आता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.क्लिक केल्यानंतर, तुम्हाला फॉर्मची यादी दिसेल.
यादीत तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा पर्याय निवडावा लागेल. महाराष्ट्र-विधवा-पेन्शन-योजना-फॉर्म निवड केल्यानंतर, फॉर्म तुमच्या स्क्रीनवर उघडेल. फॉर्म उघडल्यानंतर, आता तुम्ही येथून सहजपणे अर्जाची PDF डाउनलोड करू शकता.
फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की अर्जदाराचे नाव, पत्त्याशी संबंधित माहिती, जन्मतारीख इ. प्रविष्ट करावी लागेल.
सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला फॉर्मसोबत मागवलेल्या कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत जोडावी लागेल.
आता तुम्हाला तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तुमचा पेन्शन योजनेचा अर्ज सादर करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळेल.

फॉर्मसाठी येथे क्लीक करा
Online Registration