पावसाचा फटका, महाराष्ट्र एक्सप्रेस ‘या’ स्टेशनपर्यंतच धावणार

जुलै 29, 2021 2:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । राज्यात पाऊस सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहे. या पावसाचा फटका महाराष्ट्र एक्सप्रेसला देखील बसला आहे. काेल्हापुरात पुराचा कहर सुरू असल्याने गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी आता काेल्हापूरऐवजी मिरजपर्यंतच जाते. 

maharashtra

महाराष्ट्र एक्स्प्रेस ही गाडी काेल्हापूरपर्यंत जाते. मात्र काेल्हापुरातील सध्याच्या पूरस्थितीमुळे ही गाडी मिरजपर्यंतच धावते आहे. काेल्हापुरातील पूरस्थिती ओसरल्यावर ही गाडी नेहमीप्रमाणे काेल्हापूरपर्यंत चालवली जाईल.

सध्या ही गाडी मिरजपर्यंतच धावत असून, तेथूनच परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. आगामी काही दिवस महाराष्ट्रची अशीच स्थिती कायम राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now