जळगाव जिल्हा

लोकसंघर्ष मोर्चा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । मुक्ताईनगर मधील राजुरा गावात पुन्हा वनविभागाचा उच्छाद वन दावेदारांच्या शेतातील उभी पिके मारहाण करत उपटून फेकलीत व खोट्या केसेस केल्यात वनक्षेत्रात पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनींवरती त्यांचे दावे नियमित करण्यासाठी संसदेने 16 सप्टेंनबर 2006 रोजी आदिवासी व वननिवासी यांच्यावर शतकानुशतके अन्याय झाला आहे. तो दूर करण्यासाठी वनहक्क कायदा पारित केला या कायद्याअंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा गावातील 14 शेतकऱ्यांनी आपले दावे दाखल केले आहेत . मात्र वनविभागाने वनपरिक्षेत्र वदोडा यांचे कार्यालय कुर्हा काकोडा येथील वनकर्मचारी यांनी या शेतकऱ्यांना दादागिरी व धमक्या देत त्यांच्या शेतात बेकायदेशीर घुसत शेतात तिसऱ्यांदा पेरलेले उभे पीक उपटून नष्ट केले व त्यांच्यावर उलट शेतकऱ्यांच्याच शेतात घुसूनही 353 कलमाखाली केसेस दाखल केल्यात वनविभागाच्या या अन्यायाच्या विरोधात आज लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात उपटलेली पिके घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेतली.

यावेळी प्रतिभा यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर या शेतकऱ्यांची बाजू मांडत या वनकर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची व ज्या दावेदारांचे दावे अद्याप प्रलंबित आहेत त्यांच्या शेतात वनविभागाने कुठलीही आगळीक करू नये अन्यथा आम्हाला कोरोना काळात ही तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभागावर नाराजी व्यक्त करत उपविभागीय वनहक्क तपासणी समिती मार्फत सदर शेतात झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याबाबत व संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे

Related Articles

Back to top button