जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पाळधीसह परिसरातील चमगाव, चांदसर, शेरी, सोनवद, वाकटुकी, बाभूळगाव, नांदेड, नारणे, अंजनविहीरे ( ता.धरणगाव ) शेतीशिवारात गेल्या आठ ते दहा दिवसांत बिबट्याचा वावर असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे हिंस्त्र वन्यप्राण्यांचा धाेका ओळखून कृषीपंपांना रात्री नव्हे तर दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात कडुबा कोळी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे, चांदसरचे लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, जीवा सेना तालुका उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, भूषण महाजन, समाधान वाघ, किशोर पाटील, भय्या पाटील उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- एक व्हिजनरी नेतृत्व माजी खा. डॉ. उल्हास पाटील
- गोदावरी फाऊंडेशनतर्फे बैलपोळा सण उत्साहात साजरा
- ज्येष्ठ साहित्यिक, कवी ना. धों. महानोर यांना मान्यवरांनी वाहिली श्रध्दांजली
- अभिमानास्पद ! जळगावच्या सुपुत्राने निभावली चांद्रयन ३ मध्ये महत्त्वाची भूमिका
- पोलीसांची मोठी कारवाई : तब्बल इतका गुटखा केला जप्त !