जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा गावातील युवकाला नाचण्याच्या कारणावरून चाकूने पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न २८ डिसेंबरला झाला होता. जखमी तरुणाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे चारही संशयितांवर खुनाचे कलम वाढविले आहे.
बांभोरी येथील संशयित विजय नन्नवरे, संदीप नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे आणि अजय नन्नवरे या चौघांनी अतुल कोळीला (वय २५) मारहाण केली होती. तसेच संशयित अजय नन्नवरे याने चाकूने अतुलच्या पोटावर, मांडीवर, हातावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अतुल कोळी याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान पाचव्या दिवशी अतुलचा मृत्यू झाल्याने खुनाचे कलम वाढले.
हे देखील वाचा :
- ऐनपूरच्या शेतकऱ्याला लावला २३ लाखांचा ऑनलाईन चुना ; अशी झाली फसवणूक
- रास्ता अडवून मारहाण करत पैशाची बॅग हिसकावून झाले पसार ; जळगावातील धक्कादायक प्रकार
- धक्कादायक ! झोळीत झोपलेल्या ८ महिन्यांच्या चिमुकल्याला चोरले..
- भयंकर ! दुचाकी घसरल्याने माय-लेकाला मागून येणाऱ्या टँकरने चिरडले
- भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना